मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पंढरपूर-मंगळवेढामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून माता-भगीनी काम करीत आहेत. फक्त शेती व्यवसाय करुनही उपजिवीका भागत नाही. सततची दुष्काळी परिस्थिती आहे. महिलांना शेतीमध्ये काम करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ही विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना आर्थिक स्थैर्य ,आर्थिक पाठबळ व मार्गदर्शन करण्याचे वचन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी दिले आहे.ते देगांव, शरदनगर, घरनिकी, मारापूर, गुंजेगांव, म.शेटफळ, ल.दहिवडी,लें.चिंचाळे, शिरसी, गोणेवाडी, खुपसंगी, जुनोनी, पाठखळ, आंधळगांव आदि ठिकाणी प्रचार दौ-याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
या प्रचार दौ-यामध्ये पंचायत समिती सभाती प्रदिप खांडेकर, मार्केट कमेटी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे,सुरेश भाकरे, विजय माने, बाळासो शिंदे,संजय पवार, ॲड.दत्तात्रय तोडकरी, धनंजय पाटील गुरुजी, लक्ष्मण मस्के,बिरा कोळेकर, मारुती गायकवाड, समाधान क्षिरसागर, भारत निकम, परमेश्वर येणपे, खंडू खंदारे,शिवाजी पटाप, औदुंबर मोरे, हिम्मत पाटील, सतिश मोहिते, रामभाऊ दोलतोडे, गजानन शिंदे, डॉ.लक्ष्मण गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना समाधान आवताडे म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधींना दहा वर्षे संधी दिली, परंतु विकास काय केला हा सा-या जनतेचा प्रश्न आहे. फक्त गाठीभेटी घेतल्या किंवा संपर्क ठेवला म्हणजे विकास झाला असे जनतेने समजायचे का. मंगळवेढयातील एम.आय.डी.स.ची जमीन सौर उर्जा प्रकल्पाला दिली गेली. या ठिकाणा ऐवजी माळरानावर या प्रकल्पाला जागा दिली असती तर या मंगळवेढयातील जागेत अनेक लघु उद्योग उभारले गेले असते. अनेकांच्या हाताला काम मिळाले असते. परंतु दूरदृष्टीचा अभाव आणि वक्रदृष्टीचा दृष्टीकोण याला कारणीभूत आहे. आई वडिलांनी जन्म दिला, जेष्ठांनी तुम्लाला संस्कार दिले आहेत ,या मातीत तुम्ही रमला आहात आता वेळ आली आहे या मातीचे रुण फेडण्याची. शेतीला पाणी देतो, उद्योग-व्यवसाय उभे करतो. बस्स झाल्या आता तुमच्या या घोषणा. जनतेला जास्त दिवस तुम्ही फसवू शकत नाही. मतदार राजा आता हुशार झाला आहे. गट-तट बाजूला ठेवा , मतदारसंघाच्या विकासासाठी संधी द्या असे आवाहन उमेदवार समाधान आवताडे यांनी शेवटी केले.
या प्रचार सभांमध्ये प्रा.येताळा भगत, दत्तात्रय जमदाडे,संचालक सचिन शिवशरण, ॲड.दत्तात्रय तोडकरी, डॉ.लक्ष्मण हेंबाडे, प्रा.समाधान क्षिरसागर, मारुती गायकवाड, राहूल भुसे, बनसोडे गुरुजी, पांडूरंग रायबान, प्रमिला शिंदे, सुभाष चौगुले, मुकेश वाडेकर, दिपक सुडके, हणमंत मस्के, अनिल पाटील, वसंत लेंडवे, दत्तात्रय वाघमारे आदिनीही मनोगत व्यक्त केले.
सदर प्रचार दौ-यामध्ये स्वयंस्फूर्तीने अलोट असा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी संबंधीत गावातील चंद्रकांत गरंडे, कांतीलाल मासाळ, परमेश्वर मासाळ, लक्ष्मण गरंडे, संजय पाटील सर, विठोबा मासाळ, गणपत टकले, जगन्नाथ बनसोडे, ईश्वर बनसोडे, सुभाष ढेकळे, गणपत ढेकळे, दगडू मुलाणी, दिलीप भुसे, गोरख टाकळे, बाबु भुसे, चाँद मुलाणी, विठठल पाटील, सिध्देश्वर पाटील, आबा क्षिरसागर, विजय पवार, मनोहर मोरे, विनायक यादव, भगवान आसबे, आबा जानकर,नवनाथ आसबे, संतोष भगरे, सुब्राव यादव, बाबुराव पाटील, संतोष पाटील, डॉ.सत्यवान यादव, बंडोपंत पाटील, दिपक सुडके, बबन म्हमाणे, संभाजी सुडके, नवनाथ सुडके, रामचंद्र जुंदळे, श्रीकांत पाटील, मल्लीकार्जून जुंधळे, योगेश नरळे, हणमंत अनपट, ढोणे सर, बालाजी मेटकरी, बाबू ढोणे, तुकाराम काळुंखे, अंगद चौगुले, अंकुश चौगुले, महादेव चौगुले, सुनिल माळी, संभाजी गोडसे, संतोष माळी, हणमंत मस्के, बळी मस्के, आप्पा शिनगारे, अजीत माळी, बाबासो बाबर, शिवाजी पाटील, हरीदास औताडे, वसंत पाटील, सुभाष गायकवाड, श्रीमंत गायकवाड, हरीभाऊ आवताडे, दत्तात्रय वाघमारे, काकासाहेब पाटील, मधुकर पवार, दादासो लेंडवे, विष्णू लोखंडे, गोरख औताडे, किसन लेंडवे, बलभिम लेंडवे, राजाराम कडलासकर, दगडू बनसोडे, नागन्नाथ बनसोडे, भिमराव बनसोडे, युसूफ शेख, राजकुमार स्वामी, यांचेसह वरील गावातील सरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, सदस्य, पदाधिकारी, मान्यवर, समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते.सदर प्रचार दौ-याच्या सभेचे सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले.
हाकेला धावून येणारा नेता : मारुती गायकवाड
मी कोणत्या पक्षाशी बांधील नाही तर जे सत्य आहे त्यांच्या मागे उभा राहणारा आहे. जनतेने खरं काय आहे ते पहावे तर वा-याच्या मागे लागू नये. निवडणूका आल्यावरच त्यांना माता-भगिनी दिसतात आणि साड्या वाटतात. हे लबाडाचं राजकारण त्यांनी बंद करावे. रात्री समाधान आवताडे यांना हाक द्या या हाकेला धावून जाणारे तडफदार असे नेतृत्व समाधान आवताडे आहेत. याचसाठी मी समाधान आवताडे यांना पाठिंबा जाहीर करीत आहे असे त्यांनी सांगितले.
तसेच या प्रचार दौ-याच्या वेळी गुंजेगांव येथे महादेव ढोणे सर, सुधाकर काळुंखे, बाळासो मेटकरी, बिराप्पा ढोणे, महमद मुलाणी, यांनीही समाधान आवताडे यांना पाठिंबा दर्शवून आवताडे गटात जाहीर प्रवेश केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज