टीम मंगळवेढा टाईम्स ।
सध्या राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके मतदारांना भावनिक साद घालत आहेत. त्यांच्या भाषणात एकही विकासाचा मुद्दा येत नाही.
आमदार भारत भालके यांनी कधीच आपल्या नेत्यांचे कौतुक केले नाही. साहेब, माझा प्रश्न मार्गी लावावा लागतोय. अस करावं लागतंय, तसं करावं लागतंय पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेसाठी करावंच लागतंय असे आमदार भारत भालके मुख्यमंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांना सांगायचे. वेळ प्रसंगी आपल्या प्रश्नासाठी भांडायचे…..
भगीरथ भालके आमदार भारत भालकेंचा रक्ताचा नाही तर विचारांचा वारस आहे म्हणून सभांमध्ये सांगत आहेत. परंतु आमदार भालके सारख प्रश्नांवर न बोलता फक्त आणि फक्त भावनिकतेचा मुद्दा घेऊन आपला प्रचार करत आहेत.
विचारांचा वारस भावनिकतेवर स्वर होऊन निवडणूक लढत आहे. हे मतदार कितपत स्वीकारतील हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. परंतु पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
गेल्या 11 वर्षात 35 गावच्या पाणी पाण्यावरच राजकारण झालं. प्रशासकीय मान्यता सोडून दुसरं काही मिळालं नाही. बेरोजगारांचा प्रश्न आहे. 11 वर्षात एकही नवीन उद्योग आपल्या भागात सुरू झाला नाही.
एम.आय.डी.सीचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचाच मुद्दा होतोय. असे अनेक प्रश्न भगीरथ भालकेंना घेता येतील परंतु भावनिक होऊन, बोलून निवडणूक जिंकता येईल पण लोकांचे प्रश्न सोडवता येणार नाहीत.
भारतनानांना जशी साथ दिली तशी मला साथ द्या, तसेच सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ प्रसारीत करून भावनिक वातावरणात केलं जातं आहे.
ग्रामीण भागात महावितरणवाले शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडत आहेत त्यामुळे उभी पीक उन्हात जाळून जात आहेत. आज आमदार भारत भालकें असते तर एकही कनेक्शन तोडू दिलं नसतं….
आमदार साहेबांचा विचारांचा वारसा सांगताना आमदार साहेबांच कर्तृत्व समजून घ्या…मग विचारांचा वारस म्ह्णून सांगा असे मत शेतकाऱ्यामधून येत आहे….
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज