टीम मंगळवेढा टाईम्स । पतंजलीचे औषध घेतल्यानंतर कोरोनाचे रुग्ण ५ ते १४ दिवसात ठणठणीत झाले असा दावा आचार्य बालकृष्ण यांनी केला आहे. कोरोना या रोगाचा इलाज आयुर्वेदिक औषधामुळे शक्य आहे.(After taking Patanjali’s medicine, he became chronically ill and will give evidence in five days)
आमचे औषध घेणाऱ्या ७० टक्के लोकांचा कोरोना हा अवघ्या पाच दिवसांमध्ये बरा झाला. इतकेच नाही तर जे पेशंट कोरोना पॉझिटिव्ह झाले होते ते आमच्या औषधानंतर निगेटिव्ह झाले, असाही दावा बालकृष्ण यांनी केला आहे. आम्ही औषध शोधल्याचा दावा करतो आहोत तर आमच्याकडे पुरावे मागितले जाणार हे उघड आहे.
आम्ही पुढच्या पाच दिवसांमध्ये याबाबतचे सगळे पुरावे देत आहोत असेही बालकृष्ण यांनी सांगितले . तसेच आम्ही क्लिनिकल ट्रायल्सही करतो आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज