टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर प्रहार संघटनेचे सुरू केलेल्या आंदोलनाची तब्बल २५ दिवसानंतर प्रशासनाने दखल घेतली. प्रहार संघटनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख रामदास खोत यांच्या पुढाकाराने प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्या उपस्थितीत उपोषण समाप्त करण्यात आले.
यामध्ये काझी बाधित शेतकऱ्यांचा भूसंपादन मोबदला एक महन्यिाच्या आत पूर्णपणे अदा करू असे लेखी आश्वासन प्रांताधिकारी यांनी दल्यिाने मंगळवेढा तालुक्यातील कोट्यवधीच्या शेतकऱ्यांच्या अडकलेल्या रकमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग १६६ मध्ये गेलेल्या जमिनीचे भूसंपादित झालेल्या अनेक शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता. त्यामुळे प्रहार संघटनेचे सद्रिाया माळी व मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी हे आंदोलन सुरू ठेवले.
जुनोनी येथील लक्ष्मीबाई बोधगिरे या जीवंत असताना मयत दाखवून त्यांचा मोबदला दुसऱ्याला दिला होता. अखेर त्यांच्या घराचा मोबदला त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला.
सांगोला येथील मच्छद्रिं कांबळे यांचा हस्सिा त्यांना न्याय प्रवष्टि बाब संपल्यानंतर त्यांना त्यांच्या हिशानुसार मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन दिले.
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर, ब्रह्मपुरी, मंगळवेढा, कचरेवाडी, गणेशवाडी, आंधळगाव येथील शेतकऱ्यांच्या काझी बाधीत जमिनी गेलेल्या होत्या. पण त्यांना मोबदल्यापासून काही कारणास्तव थांबावे लागत होते. तेही एक महन्यिापर्यंत सगळ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
आ. बच्चू कडू यांच्याशी फोनवरून चर्चा
प्रहार संघटनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख रामदास खोत हे आंदोलन स्थळे आले व मंगळवेढा उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर, ‘प्रहार’चे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
यावेळी काझी बाधित शेतकऱ्यांना एक महन्यिाच्या आत मोबदला वर्ग करण्यात येईल असे लेखी अश्वासन समिंदर यांनी दिले. त्यानंतर खोत यांच्या हस्ते लिंबु पाणी घेऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज