टीम मंगळवेढा टाईम्स ।
आ.समाधान आवताडे यांनी सन २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारलेल्या लक्षवेधी पाठपुराव्यामुळे, गावभेट दरम्यान नागरिकांच्या आलेल्या मागणीमुळे
म्हैसाळ उपसा जलसिंचन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलणी करून केलेल्या पाठपुराव्यामुळे व मंगळवेढा तालुक्यातील पाण्याची भीषणता लक्षात घेऊन
आ.समाधान आवताडे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे आ.आवताडे यांनी सांगितले.
तसेच तालुक्यातील पाणी प्रश्न अनुषंगाने मारोळी, चिक्कलगी, जंगलगी व शिरनांदगी या गावातील नागरिकांच्या मागणीस आपल्या कृतीतून प्रतिसाद देत या गावांच्या भागात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून वितरिका क्र २ मधून कॅनॉल द्वारे पाणी सुरू झाले.
त्याचबरोबर उर्वरीत लवंगी, सलगर बु, सलगर (खु) आसबेवाडी या गावांना ही येत्या दोन दिवसांत पाणी सोडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
वितरीका क्र.१ मधून रेवेवाडी, लोणार, ममदाबाद (हू) आणि हुन्नुर या भागातील बंधारे मागणी प्रमाणे म्हैसाळच्या पाण्याने भरून देण्यात आले आहेत.
वर्षानुवर्षे दुष्काळाच्या खाईत दिवस काढलेल्या या भागातील लोकांच्या या पाण्यामुळे थोडाफार आशेचा किरण निर्माण झाला असून यापुढेही पाणीप्रश्नांच्या बाबतीत नव्याने आ.समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभा करण्याचे अपेक्षा बोलून दाखवली.
आ.समाधान आवताडे हेच या प्रश्नाला न्याय देऊ शकतील अशी भावना लोकांनी बोलून दाखवली.
कायम दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या मंगळवेढा तालुक्यांतील दक्षिण भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे चित्र निर्माण झाले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज