टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनाही मताचा अधिकार देण्याचा निर्णय नुकताच शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे.
त्यामुळे समितीच्या निवडणुकीला मिनी विधानसभेचे स्वरूप प्राप्त होणार आहे. मंगळवेढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे जवळपास ६० हजार शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मंगळवेढा बाजार समितीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.
बाजार समितीच्या संचालकपदाच्या २० जागांसाठी हमाल मापाडी, ग्रामपंचायत व सोसायटीचे सभासद मतदार मतदानाचा हक्क बजावतात.
मात्र, आता शेतकऱ्यांना सरसकट मतदानाचा नुकताच अधिकार आल्यास मतदारांची संख्या वाढणार आहे.
शेतकऱ्यांना मताचा अधिकार देण्याचा निर्णय हा लोकहिताचा निर्णय आहे. आतापर्यंत एकूण मतदारांपैकी ठरावीक लोकच निवडून येत होते.
मात्र, आता सर्वसामान्य शेतकऱ्यांलाही निवडणुकीस उभे राहता येणार आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत काही मतमतांतरे व्यक्त होत आहेत.
बाजार समितीसाठी हा निर्णय खर्चिक असल्याचे म्हटले जात आहे आतापर्यंत बाजार समिती निवडणुकीत व्यापारी, हमाल मापाडी, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे संचालक, ग्रामपंचायतींचे सदस्य हेच मतदानासाठी पात्र ठरत होते.
त्यामुळे या निवडणुकीसाठी मर्यादित मतदार असल्याने निवडणूक लढवणाऱ्यांना फार खर्च करावा लागत नव्हता. शिवाय निवडणूक घेणाऱ्या प्राधिकरणासही तितकासा ताण नव्हता.
मात्र सर्वच शेतकऱ्यांना आता मतदानाचा अधिकार मिळाल्याने मतदार संख्या वाढेल. विधानसभेसारखे गावोगावी प्रचाराला जावे लागणार असल्याने खर्च वाढणार आहे.(स्रोत:लोकमत)
शेतकऱ्यांना न्याय मिळेल
मार्केट कमिटीत शेतकऱ्यांना मताचा अधिकार देण्याचा शिंदे- फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय हा लोकहिताचा आहे. या क्रांतिकारी निर्णयाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल. – आमदार समाधान आवताडे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज