टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे असून लवकरच या योजनेचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे सूतोवाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.
मंगळवेढा तालुक्यातील 35 गावाच्या पाण्याच्या प्रश्नावर अनेक राजकीय खलबली खलबते झाले असून या योजनेला मुहूर्त मिळाला नाही.
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत यावर देखील अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या योजनेबाबत सलगर बुद्रुक येथील सभेत सविस्तर विश्लेषण केले होते.
मात्र पोटनिवडणुकीच्या निकालानंतर या योजनेच्या बाबत हालचाली होत नसल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते व यावर राज्यातील सत्ताधारी पक्ष व केंद्रातील सत्ताधारी पक्ष यांनी या भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन दिले होते.
परंतु त्याबाबतची पूर्ती होत नसल्याबाबत या भागातील नागरिकातून नाराजीचा सूर होता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न लोकांसमोर येत होता.
मात्र स्व.आ.भालके यांनी लोकांसमोर ठेवत याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला 2014 या योजनेला मान्यता घेत काँग्रेस प्रवेश केला त्यानंतर राज्यात झालेल्या सत्ता बदलामुळे 2014 ते 2019 या कालावधीमध्ये या योजनेचे पाणी व गावे कमी करून दाखल केलेला प्रस्ताव 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्रुटी लागून परत आला.
त्यानंतर महाविकास आघाडीच्या रूपाने नवीन राज्यात सत्तेचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर स्व.आ.भालके यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठक घेऊन पाणी व गावे पूर्ववत ठेवण्यात यश मिळवले.
दरम्यान, आजारपण आणि कोरोना साथीचा विळख्यात स्व.आ.भारत भालके यांचे अकाली निधन झाले त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहताना विधिमंडळात त्यांच्या अपूर्ण योजनेला मार्गी लावणे ही त्यांना श्रद्धांजली ठरणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले होते.
पोटनिवडणुकी पूर्वी या योजनेचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. या बाबतचा प्रस्ताव सध्या मंत्रालयात प्रलंबित आहे. शिरनांदगीचे गुलाब थोरबोले यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला स्व.भारत भालके यांचे नाव देण्याची ठराव राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडला होता.
मात्र या योजनेच्या मंजुरीबाबतच्या हालचाली थंड होत्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ला पंढरपूर येथे आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रचार सभेच्या सुरुवातीलाच 35 गावांचा पाणी प्रश्न आम्ही मार्गी लावतो आश्वासन दिले होते.
त्यानंतर पोटनिवडणुकीत हे समाधान आवताडे यांना आमदार करा केंद्रातून निधी आणून योजना मार्गी लावतो असे आश्वासन दिले.
मात्र त्याने या प्रश्नावर साधा ब्रँ शब्द देखील काढला नाही त्याचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना दिसून येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या बातमीची दखल घेत पंढरपूर येथे बोलताना या योजनेचे भूमिपूजन लवकरच करणार असल्याचे संकेत दिल्यामुळे या भागातील नागरिकाचे आता या योजनेच्या मंजुरी कडे लक्ष लागले आहे.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज