मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जिल्हा प्रशासनाने ‘आयुष्यमान भारत’ योजनेसाठी 29 फेब्रुवारीपर्यंत ‘स्मार्ट कार्ड’ काढण्यासाठी मुदत दिली आहे. मात्र शासनाची वेबसाईट खूपच सावकाश असल्यामुळे लाभार्थ्यांचे कार्ड काढण्यासाठी विलंब होत आहे. लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती भरूनही लवकर अर्ज अपलोडच होत नाही. त्यामुळे जादा पैसे देऊनही ‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड मिळणे कठीण झाले आहे.
‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य’ योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील साडेतीन लाख कुटुंबांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘गोल्डन कार्ड’चे वितरण करण्यात आले आहे.
ही योजना ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी आहे. केंद्र शासनाने सामाजिक, आर्थिक, जातीय व जनगणनेनुसार केलेल्या सर्वेक्षणातील लाभार्थ्यांची या योजनेसाठी निवड केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला शासनाकडून पत्र पाठविण्यात आले होते. परंतु लाभार्थ्यांनी ‘स्मार्ट कार्ड’च काढले नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. सध्या ‘आयुष्यमान भारत’ योजनेचे कार्ड काढण्यासाठी गावोगावी ऑनलाईन महा-ई-सेवा केंद्रामध्ये लाभार्थी गर्दी करत आहेत. परंतु कार्ड काढण्यासाठीची वेबसाईटच सावकाशपणे सुरू आहे. त्यामुळे एका लाभार्थ्याचे नाव अपलोड होण्यास विलंब होत आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांत तर वेबसाईटच चालत नाही. त्यामुळे गावात महा-ई-सेवा केंद्रचालक येऊनदेखील नेटवर्कची समस्या जाणवत असल्यामुळे कार्ड काढता येत नाही. शिवाय एका कुटुंबातील सर्व व्यक्तींना शहरात आणून अंगठ्याचे ठसे घेण्यासाठी वेळ लागत आहे.
ज्या लाभार्थ्यांना या योजनेचे पत्र वाटप केले आहे ते लाभार्थी कार्ड काढण्यासाठी जात आहेत. मात्र अनेक लाभार्थ्यांकडून अशी तक्रार केली जात आहे की, आमचे नाव यादीमध्ये आहे, परंतु आम्हाला पत्रच मिळाले नाही. त्यामुळे ‘स्मार्ट कार्ड’ काढायचे कसे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.
जिल्ह्यात घरोघरी आशा वर्कर या लाभार्थ्यांना ‘आयुष्यमान भारत’ योजनेचे कार्ड काढण्यासाठी बोलावून घेऊन जात आहेत. परंतु आशा वर्कर व गावातील संगणकचालकांना कार्ड काढण्यासाठी येणार्या अडचणी सोडविण्यासाठी समन्वयकाकडून व्यवस्थित माहिती मिळत नसल्यामुळे अनेक लाभार्थी कार्ड काढण्यापासून वंचित राहात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने 29 फेब्रुवारी मुदत दिली असली तरी आतापर्यंत निम्मे ‘स्मार्ट कार्ड’देखील काढण्यात आले नाहीत. त्यामुळे ‘आयुष्यमान भारत’ योजनेपासून हजारो लाभार्थी वंचित राहणार असून यासाठी आणखी मुदत वाढविण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. नुकतीच जिल्हाधिकार्यांनी बैठक घेऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ काढण्याचे आवाहन लाभार्थ्यांना केले होते.
मुदत वाढवून देण्याची मागणी
‘आयुष्यमान भारत’ योजनेत जिल्ह्यातील साडेतीन लाख कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांकडे योजनेचे ‘गोल्डन कार्ड’ असणे आवश्यक आहे. महा-ई-सेवा केंद्रावर ऑनलाईन हे कार्ड काढून देण्यात येत असून 29 फेब्रुवारी कार्ड काढण्याची शेवटची मुदत आहे. परंतु कार्ड काढण्याचे संकेतस्थळच नादुरूस्त असल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी कार्ड काढण्यापासून वंचित राहण्याची शक्यता बळावली असल्याने मुदत वाढवून देण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होऊ लागली आहे.
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जिल्हा प्रशासनाने ‘आयुष्यमान भारत’ योजनेसाठी 29 फेब्रुवारीपर्यंत ‘स्मार्ट कार्ड’ काढण्यासाठी मुदत दिली आहे. मात्र शासनाची वेबसाईट खूपच सावकाश असल्यामुळे लाभार्थ्यांचे कार्ड काढण्यासाठी विलंब होत आहे. लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती भरूनही लवकर अर्ज अपलोडच होत नाही. त्यामुळे जादा पैसे देऊनही ‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड मिळणे कठीण झाले आहे.
‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य’ योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील साडेतीन लाख कुटुंबांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘गोल्डन कार्ड’चे वितरण करण्यात आले आहे.
ही योजना ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी आहे. केंद्र शासनाने सामाजिक, आर्थिक, जातीय व जनगणनेनुसार केलेल्या सर्वेक्षणातील लाभार्थ्यांची या योजनेसाठी निवड केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला शासनाकडून पत्र पाठविण्यात आले होते. परंतु लाभार्थ्यांनी ‘स्मार्ट कार्ड’च काढले नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. सध्या ‘आयुष्यमान भारत’ योजनेचे कार्ड काढण्यासाठी गावोगावी ऑनलाईन महा-ई-सेवा केंद्रामध्ये लाभार्थी गर्दी करत आहेत. परंतु कार्ड काढण्यासाठीची वेबसाईटच सावकाशपणे सुरू आहे. त्यामुळे एका लाभार्थ्याचे नाव अपलोड होण्यास विलंब होत आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांत तर वेबसाईटच चालत नाही. त्यामुळे गावात महा-ई-सेवा केंद्रचालक येऊनदेखील नेटवर्कची समस्या जाणवत असल्यामुळे कार्ड काढता येत नाही. शिवाय एका कुटुंबातील सर्व व्यक्तींना शहरात आणून अंगठ्याचे ठसे घेण्यासाठी वेळ लागत आहे.
ज्या लाभार्थ्यांना या योजनेचे पत्र वाटप केले आहे ते लाभार्थी कार्ड काढण्यासाठी जात आहेत. मात्र अनेक लाभार्थ्यांकडून अशी तक्रार केली जात आहे की, आमचे नाव यादीमध्ये आहे, परंतु आम्हाला पत्रच मिळाले नाही. त्यामुळे ‘स्मार्ट कार्ड’ काढायचे कसे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.
जिल्ह्यात घरोघरी आशा वर्कर या लाभार्थ्यांना ‘आयुष्यमान भारत’ योजनेचे कार्ड काढण्यासाठी बोलावून घेऊन जात आहेत. परंतु आशा वर्कर व गावातील संगणकचालकांना कार्ड काढण्यासाठी येणार्या अडचणी सोडविण्यासाठी समन्वयकाकडून व्यवस्थित माहिती मिळत नसल्यामुळे अनेक लाभार्थी कार्ड काढण्यापासून वंचित राहात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने 29 फेब्रुवारी मुदत दिली असली तरी आतापर्यंत निम्मे ‘स्मार्ट कार्ड’देखील काढण्यात आले नाहीत. त्यामुळे ‘आयुष्यमान भारत’ योजनेपासून हजारो लाभार्थी वंचित राहणार असून यासाठी आणखी मुदत वाढविण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. नुकतीच जिल्हाधिकार्यांनी बैठक घेऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ काढण्याचे आवाहन लाभार्थ्यांना केले होते.
मुदत वाढवून देण्याची मागणी
‘आयुष्यमान भारत’ योजनेत जिल्ह्यातील साडेतीन लाख कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांकडे योजनेचे ‘गोल्डन कार्ड’ असणे आवश्यक आहे. महा-ई-सेवा केंद्रावर ऑनलाईन हे कार्ड काढून देण्यात येत असून 29 फेब्रुवारी कार्ड काढण्याची शेवटची मुदत आहे. परंतु कार्ड काढण्याचे संकेतस्थळच नादुरूस्त असल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी कार्ड काढण्यापासून वंचित राहण्याची शक्यता बळावली असल्याने मुदत वाढवून देण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होऊ लागली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज