टीम मंगळवेढा टाईम्स । खेळत पाण्यात गेलेल्या दोन चुलत भावंडासह आत्याच्या मुलाचा खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथे घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रयान इक्बाल मुलाणी (वय 12) ,युसुब नईम मुलाणी (वय 10), मनोहर उम्रखान देशमुख (वय 14) ही तीन मुले दुपारी पोहण्यासाठी मरवडे रस्त्यावर घराशेजारी असलेल्या शेततळ्या सारख्या खड्ड्यात गेली होती.
बुधवारी या खड्ड्यातील पाणी कमी होते.पण गुरुवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे त्यांना या पाण्याचा अंदाज आला नाही.दरम्यान त्यातील एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांचे सापडले नसल्याचे बख्तावर शेख याने 3.30 वा याची खबर तात्काळ आई वडीलांना येऊन दिली असता.
सर्व नातेवाईक घटनास्थळी गेले असताना उपस्थित जमावांनी तिघांचे मृतदेह काढून ठेवले व त्यांच्या शरीरात कसल्याही प्रकारची हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
लॉकडाऊन मुळे गेल्या दोन महिन्यापासून सुट्टीसाठी मामाच्या गावी आलेल्या मनोहरला मृत्यूने गाठले. या घटनेमुळे तळसंगी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची खबर पोलिसात अजीम मुलाणी यांनी दिली.
Three children drown in pit; Unfortunately incident in Mangalwedha taluka
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज