मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहर व तालुक्यात काल रात्री साडेआठच्या सुमारास आवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह मोठी हजेरी लावल्याने हाता तोंडाला आलेल्याआंबा, डाळिंब, केळी बागांचे नुकसान झाले.
शहरालगत गारांचा पाऊस पडला आहे, या संकटातून सावरताना शेतकऱ्यांनामोठी दमछाक होणार आहे. तरी अगोदरच कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. द्राक्षांचे पीक अंतिम टप्यात असून बऱ्याच शेतकऱ्यांनी बागा उतरवण्याच्या राखल्या आहेत.
तर काही जणानी बेदाना करण्यासाठी शेडवर द्राक्ष टाकलेली आहेत. आंब्याचे पीक अंतिम टप्यात आहे, आंबा व केळी उतरण्यास सुरुवात झाली आहे, या आवकाळी पावसामुळे बेदाण्याची प्रत खराब होणार आहे.
दिवसभर कडक होते, अचानक रात्री वादळी वारे व ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी वर्गसंकटात सापडला आहे. शहरातील साठेनगर या भागातील पत्रे मोठ्या प्रमाणात उडून गेले आहेत. तर ग्रामीण भागात देखील जनावरांच्या गोट्यांचे पत्रे राहत्या, घरांचे पत्रे उडून गेले आहेत.
पोलिस जखमी, कागदपत्रे भिजली
पोलिस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर तपासी अंमलदारच्या रूमवरील पत्रे उडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले असून, पोलिस नाईक निंबाळकर किरकोळ जखमी झाले आहेत. तिथे महत्त्वाचे कागदपत्रे पावसात भिजली आहेत.
तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक गोष्टींचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तलाठी यांना दिले आहेत. शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई दिली जाईल. – मदन जाधव, तहसीलदार, मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज