टीम मंगळवेढा टाईम्स ।
उन्हाळ्यामधील पंढरपूर तालुक्यातील पाण्याचे दुर्भीक्ष कमी करण्यासाठी नीरा उजव्या कालव्यातून उन्हाळी हंगामात दुसरे अवर्तन मिळावे अशी मागणी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केली होती.
उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या उन्हाळा हंगाम सन २०२२ अनुषंगाने पुणे येथे झालेल्या बैठकीत आ.आवताडे यांनी ही मागणी केली होती.
ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना थंडावा देणारी एक बातमी आज आली आहे. ऐन मे महिन्याच्या उकाड्यात शेतात उभ्या पिकांना पाण्याचा ताण जाणवतो.
पंढरपूर व मंगळवेढा परिसरातील शेतकऱ्यांसाठी मे महिना परिक्षा पाहणारा असतो. परंतू आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
नीरा उजवा आणि डाव्या कालव्यातून सध्या सुरु असलेल्या आवर्तनाला जोडून अजून एक आवर्तन ३० जूनपर्यंत देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
नीरा प्रणालीअंतर्गत भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी या सर्व धरणात मिळून ३५.५३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. ते गेल्यावर्षीपेक्षा १.७५ टीएमसीने जास्त आहे. त्यामुळे हे जादाचे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या आवर्तनामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकरी तसेच या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नीरा उजवा आणि डावा कालवा, भीमा आसखेड, पवना व चासकमान प्रकल्पांची कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडली.
याप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे,आ.समाधान आवताडे, सुनील शेळके, राम सातपुते, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे या बैठकीला उपस्थित होते.
जर ३० जूननंतरही पाऊस सुरु झाल्यास उशीर झाला तर पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजनही करण्यात आले असल्याची माहिती पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिली. चासकमान प्रकल्पातूनही सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह दोन उन्हाळी आवर्तने सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
आमदार आवताडे यांनी केली होती ‘ही’ मागणी
नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी हंगामात दोन अवर्तन मिळाल्याने पंढरपूर तालुक्यातील गादेगाव, कोर्टी , बोहाळी , उंबरगाव , खर्डी , तपकीरी शेटफळ , तनाळी , तावशी , कासेगाव अनवली , एकलासपूर , रांझणी गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
पाऊस लाबल्यानंतर अनेकदा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला समोरे जावे लागते . हे टाळण्यासाठी पाणी नियोजनात बदल होणे आवश्यक असल्याचे आ.आवताडे यांनी सांगितले होते.
समांतर पाईपलाईन अंतर्गत माळशिरस पर्यंत सर्व्हे चालू आहे, तो सर्व्हे तशाच पद्धतीने पंढरपूर सीमेपर्यंत पुढे करावा, प्रशासकीय कार्य गतिमान करण्यासाठी पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालय येथे कर्मचारी यांची भरती करून ती संख्या वाढवावी अशीही मागणी आ.समाधान आवताडे यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज