टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात सत्तास्थापनेच्या संघर्षात पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा आता मागे सरला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
पहाटेच्या शपथविधीसाठी तुम्हीच अजित पवार यांना पाठवलं होतं असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता त्यांना मी पाठवलं असतं तर सत्ता स्थापन झाली असती असं म्हणत साऱ्या चर्चा फेटाळून लावल्या.
याच मुद्द्याबाबत आज अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.
अजित पवार आज पुण्यात कोरोना रुग्णवाढीच्या मुद्द्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांनीच तुम्हाला पाठवलं होतं असं म्हटलं जात आहे,
याबाबत विचारलं असता अजित पवार चांगलेच संतापले. “हे बघा याबाबत मी वारंवार बोललो आहे आणि तरीही तुम्ही तेच तेच उगाळत बसले आहात.
त्याबद्दल मी अगदी स्पष्टपणे याआधीच सांगितलं आहे की मी मला वाटेल तेव्हा मी बोलेन. तो माझा अधिकार आहे”, असं अजित पवार म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज