टीम मंगळवेढा टाईम्स । पाकिस्तानकडून होणारा घुसखोरीचा मोठा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. लष्कराने जवळपास तीन दहशतवाद्याचा खात्मा केला असून अनेक दहशतवादी जखमी अवस्थेत पळून गेले आहेत.
त्यामुळे कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा दणका दिला आहे.
मेंढर सेक्टरमधील सीमा ओलांडून भारतात घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न भारतीय लष्कराला हाणून पाडला.आधीच या भागावर लक्ष ठेवून असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी या घुसखोरांना आव्हान दिले आणि दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात तीन घुसखोर दहशतवादी ठार झाले.
उर्वरित दहशतवाद्यांना परत पळवून लावण्यास भाग पाडले गेले ज्यामध्ये 2 ते 3 जखमीही झाले.
Pakistan’s plan thwarted by Indian army; 3 terrorists killed
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज