टीम मंगळवेढा टाईम्स ।
आषाढी एकादशीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील लाखो वारकरी व भाविकांना शुभेच्छा दिल्या.
माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामार्फत लिखित स्वरुपात हा विशेष संदेश दिला आहे.
पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले
लाखो वारकरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानेपायी चालत पंढरपूर या संत नगरीमध्ये आले आहेत.
आषाढी एकादशीला आलेल्या सर्वांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे.
देशात सर्वात मोठे श्रद्धास्थान प्राचीन असलेल्या चालत काळापासून आलेल्या विठ्ठलाच्या पंढरपूरमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक आले आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर विठ्ठल मंदिर व बहुतांश पालखी महामार्ग माढा लोकसभा मतदारसंघात येत असल्याने खा.निंबाळकर यांच्या माध्यमातून वारकरी व विठ्ठल भक्तांना शुभेच्छा पाठवल्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज