टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर आमची सत्ता येतात 28 हजार सभासद हे चेअरमन व संचालक म्हणून काम करतील असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती शिवानंद पाटील यांना व्यक्त केला आहे.
वीरशैव मंगल कार्यालयात श्री.संत दामाजी शेतकरी समविचारी विकास आघाडीच्या आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, धनश्री परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे, पक्षनेते अजित जगताप, प्रहारचे संतोष पवार,अँड. नंदकुमार पवार, राहुल ताड, रामकृष्ण नागणे, तानाजी खरात, माजी नगरसेवक अरुण किल्लेदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिवानंद पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही ज्यावेळी संचालक होतो त्यावेळी सर्व शेतकरी सभासदांना न्याय देण्याची भूमिका आम्ही बजावली होती.
आमच्यानंतर स्व.भारत भालके यांचे पॅनल निवडून आले अँड. नंदकुमार पवार,प्रा.शिवाजीराव काळुंगे, शशिकांत बुगडे यांना चेअरमन केले त्यांनी शेतकऱ्यांची व सभासदांची दूरदृष्टी समोर ठेवून त्यांच्या कार्यकाळात चांगल्या प्रकारे कारखाना चालवून दाखवला.
चेअरमन व संचालक मंडळांनी 19 हजार सभासद कमी करण्याचे पाप त्यांनी केले होते. शेतकरी व सभासदांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली नाही.
सभासदांचा व तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक ठेवून बाहेरील तालुक्यातील ऊस आणून गाळप केला.
कामगारांचे पगार दिले नाहीत ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातला त्यांचे बिल देखील दिले नसल्याचा आरोप पाटील यांना केला आहे.
कर्जमुक्ती कडे आलेल्या दामाजी कारखान्यावर 185 कोटीचा डोंगर उभा केला आहे.
समविचारी एकत्र येण्याचा उद्देश म्हणजे दामाजी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे. ही शेवटची संधी आहे म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे.
येणाऱ्या काळात दामाजीचे सभासदत्व खुले करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज