टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढयाचे नवनियुक्त तहसीलदार मदन जाधव यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्विकारला असून येथील जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, येथे लाच लुचपत विभागाने धाडी टाकल्यामुळे येथील प्रशासन कारभार स्वच्छ करण्याचे नवीन तहसीलदारांपुढे मोठे आव्हान आहे.
तत्कालीन तहसीलदार स्वप्नील रावडे यांची बदली कोल्हापूर येथे झाल्याने त्यांचे रिक्त जागेवर आमदार बच्चू कडू यांच्या अचलपूर (जि.अमरावती) मतदार संघातून मदन जाधव हे येथे आले आहेत.
त्यांचे मूळ गाव सांगली जिल्हयातील खरसुंडी हे असून ते सन 2013 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परिक्षेत त्यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे.
त्यांनी आत्तापर्यंत देऊळगांवराजा जि.बुलढाणा, लोणार, सांगली आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.
नवनियुक्त तहसीलदार यांनी अनेक प्रकरणामुळे बदनाम झालेले महसूल खाते पारदर्शी कारभार करून भविष्यात महसूल विभागाला लाचेचा डंक लागणार नाही असे कार्य करून दाखवावे अशा येथील नागरिकांच्या भावना आहेत.
दरम्यान, चोरटी वाळू, पुनर्वसन, आदी प्रमाणावर त्यांना वचक ठेवावा लागणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज