जमीर इनामदार । उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीचे आरक्षण रद्द केल्याने मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीला लागला आहे. ५८ मूक मोर्चे दोन ठोक मोर्चा ४२ बांधवांचे बळी घेऊन कुठेतरी मागच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते परंतु आताच्या ठाकरे सरकारच्या हलगर्जी पणामुळे न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली आहे.
हे राज्य सरकार आपली बाजू न्यायालयांमध्ये भक्कम पणे मांडू न शकल्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले आहे असा आरोप मराठा संघटनांकडून होत आहे. त्याचबरोबर सारथी संस्थेच्या बाबतीत सुद्धा या सरकारने असेच केले मराठा समाजाच्या प्रत्येक मागणीच्या बाबतीत राज्यकर्ते उदासीन आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा संयम संपला आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये आपली बाजू भक्कमपणे मांडली असती तर मराठा समाजावर आज ही वेळ आली नसती. केवळ सरकारच्या गहाळ पणामुळे आरक्षण रद्द झाले आहे अशी भावना मराठा समाजाच्या तरुणांमध्ये निर्माण झाली आहे.
याच्याच निषेधार्थ सोमवारी मंगळवेढ्यात अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. त्याबाबतचे निवेदन संघटनेच्यावतीने मंगळवेढा पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.
यावेळी छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नागेश गायकवाड,जिल्हा संघटक जमीर इनामदार , जिल्हा संघटक मनोज चव्हाण, तालुका अध्यक्ष सुरज फुगारे, शहर अध्यक्ष सागर वाघमारे, युवक शहर अध्यक्ष वैभव ठेंगील, विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष अक्षय पवार, विद्यार्थी संघटनेचे शहर अध्यक्ष सचिन वडतीले, वाहतूक आघाडीचे तालुका अध्यक्ष नागेश नरुटे , राजे ग्रुपचे सुदर्शन ताड , संभाजी घुले, अनिल मुदगुल , माऊली कोंडुभैरी , उमेश आवताडे, प्रज्वल शिंदे , विजय माळी , पोपट पडवले , ध्रुवांकर हिरेमठ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rasta Rocco agitation of Chhawa organization on Monday to protest the suspension of Maratha reservation
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज