टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या सोमवार दि.21 सप्टेंबरला सोलापूर शहर व जिल्हा बंद ठेवून जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आसूड आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी प्रशालेच्या क्रीडांगणावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत समाजबांधवांनी आरक्षणप्रकरणी तीव्र भावना व्यक्त करीत केंद्र व राज्य सरकारचा कठोर शब्दांत निषेध केला. तसेच आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे. आता नाही तर कधीच नाही,एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा समन्वयक माउली पवार यांनी आपल्या स्वागतपर प्रास्ताविकात सरकारवर घणाघाती आरोप करीत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.
अन्यथा हा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगून येत्या दि.21 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देऊन मराठा समाज शहर व जिल्ह्यातील प्रत्येक आमदारांच्या घरासमोर आसूड ओढो आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी मोहोळचे बापू डोके, सांगोल्याचे केदार, दक्षिण सोलापूरचे विनोद पाटील, माढ्याचे प्रा.जी.के. देशमुख,बार्शीचे मंगेश दहीहंडे,सोलापूरचे नितीन चव्हाण, किसन दाडगे, राजन जाधव, निर्मला शेळवणे, उज्ज्वला साळुके, शुभांगी लंबे, प्रियंका डोंगरे आदींनी मनोगत व्यक्त करून मराठा आरक्षणाची मागणी केली.तसेच मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास त्याची किंमत सरकारला चुकवावी लागेल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे,राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे, पद्माकर काळे, प्रवीण डोंगरे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नगरसेवक विनोद भोसले, अमोल शिंदे,अक्कलकोटचे अमोलराजे भोसले, बाबाराजे निंबाळकर,संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे यांच्यासह लहू गायकवाड,ज्ञानेश्वर सपाटे,मनीषा नलावडे , लता ढेरे,दत्ता भोसले, सचिन गायकवाड आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन प्रा.गणेश देशमुख यांनी केले. आभार दत्ता मुळे यांनी मानले.
तर भावी पिढी माफ करणार नाही
मराठा समाजाला मिळालेले आरक्षण स्थगित केल्याने समाजावर खूप मोठा अन्याय झाला आहे. आता आरक्षण स्थगित केले, उद्या ते रद्दही करू शकतात.त्यामुळे मराठा समाजाला गप्प बसून चालणार नाही.आता नाही तर कधीच नाही ही भूमिका ठेवून रस्त्यावर उतरावे लागणार आहे.
अन्यथा भावी पिढी आपल्याला कधीच माफ करू शकणार नसल्याचे सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक माउली पवार यांनी सांगितले.
२१ सप्टेंबरलाच बंद का ?
दि.२१ सप्टेंबर रोजी सोलापूरच्या मराठा क्रांती मोर्चाला चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच दिवशी पुन्हा नव्या क्रांतीला सुरुवात करण्याचा निर्धार समाजबांधवांनी व्यक्त केल्याचे यावेळी सांगण्यात आले.या दिवशी ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या भागातून जाणारा राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग अडवावा,शहरातील सर्व रस्ते बंद करण्यात येतील.
आरक्षण रद्द होण्याला कोण जबाबदार
हे कोणी घडवून आणलय हे काळाच्या ओघात उघड होईलच. मराठा समाजाचे कार्यकर्ते या लोकांना उघडे पाडतील. मागील सरकारले महाधिवयाता आशुतोष कुभकोणी यांना कोटात जाऊ नये म्हणून सांगितले होते. यातून जे स्पष्ट व्हायचे आहे ते स्पष्ट होत आहे.पण आम्ही कोणाचे नाव घेणार नाही. या आदालनात सर्वपक्षीय नेते खांद्याला खांदा लावून लढतील, असे पदाधिकान्यांनी बोलून दाखवले.
Maratha community to take to the streets again; call for Solapur closed on September 21
Website : www.mangalwedhatimes.in
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज