टीम मंगळवेढा टाईम्स ।
माहेरी गेलेल्या पत्नीस बोलावण्यास गेलेल्या पतीला पत्नी,सासू,सासरे व अन्य एकाने लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी
सासरे लक्ष्मण परिट,सासू शांताबाई परीट,पत्नी वैशाली बापू कारंडे व निकिता अतुल पाटोळे(सर्व रा.आंधळगांव) या चौघाविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी यातील फिर्यादी बापू शिवाजी कारंडे(वय 40 रा.श्रीपूर) हे दि.23 रोजी दुपारी 2.00 वा. त्यांची सासूरवाडी आंधळगांव येथे माहेरी गेलेली पत्नी वैशाली बापू कारंडे हिला घेवून येण्यासाठी ते गेले होते.
दरम्यान या पती पत्नीत भांडण असल्याने तीच्या माहेरी राहिली होती.
तीला आणावयास फिर्यादी गेल्यानंतर वरील आरोपीने हाताने व लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक पठाण हे करीत आहे
मागील भांडणाचा राग मनात धरून एकास काठीने बेदम मारहाण,दोघांविरूध्द गुन्हा दाखल
मागील भांडणाचा राग मनात धरून एकास लाकडी काठीने डोकीवर,कपाळावर व हातावर मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी कुमार किशोर बनसोडे व दादा दामू सोनवले या दोघाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी समाधान सोनवले(रा.लक्ष्मी दहिवडी) हे दि.26 रोजी सायंकाळी 6.00 वा.मरीमाता मंदिरामध्ये पत्नी रेणूका हिस घेवून दर्शनासाठी गेले होते.
यातील वरील दोघे आरोपी तेथे येवून पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करून लाकडी काठीने उजव्या पायाच्या नडगीवर, डोकीस, कपाळावर मारून गंभीर जखमी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज