मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत . त्यामुळे आता लय आणि एकाग्रता कायम राखण्याचे आव्हान आहे . आणि यासाठी मी तयार असल्याचे अनुभवी भारतीय नेमबाज अभिषेक वर्मा याने सांगितले . सध्या देशभरात लॉकडाऊन असल्याने खेळाडूंचे सराव सत्रावर परिणाम झाला आहे . विश्व चषकात दोन वेळचा सुवर्ण विजेता असलेल्या अभिषेक याने सांगितले की , ‘ लय मिळवणे आणि ती कायम राखणे हे आव्हानात्मक आहे.
अर्थात त्यासाठी आम्हाला मोठा वेळ मिळेल . ‘ तीस वर्षांचा वर्मा सध्या चंदीगडला त्याच्या घरीच आहे . मात्र त्याचे लक्ष गुरुग्रामच्या अतिथीगृहात आहे . तेथे एससीएटीटीसह त्याच्या सरावाचे सारे साहित्य आहे . तो दोन – तीन दिवसांसाठी आई – वडिलांना भेटायला आला आणि येथेच अडकला . तो म्हणाला की , मला वर्षातील ३६५ दिवस सराव करायला आवडते.
मात्र सध्या मी फार सराव करु शकत नाही . मी घरी दोन दिवस थांबणार होतो . मात्र त्याच दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली . सध्या यातून काहीही मार्ग नाही . मी केवळ आशा करू शकतो की परिस्थिती लवकर सामान्य व्हावी , आणि मी पुन्हा सराव करू शकेन . ‘ वर्मा याने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये बिजिंग विश्वचषकात १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आणि ऑलिम्पिक कोटा मिळवला होता . त्यानंतर त्याने लगेचच ऑगस्टमध्ये रियो विश्वचषकात सुवर्ण मिळवले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज