मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मारापूर मंडल अधिकारी व देगाव सजेच्या तलाठी यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरु केले होते.
दरम्यान या आमरण उपोषणाची दखल तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी घेवून मंडल अधिकारी व तलाठयाच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी महसूल नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आल्याने तूर्त हे उपोषण स्थगित करण्यात आले.
मारापूर मंडलचे मंडल अधिकारी व देगाव सजेच्या महिला तलाठी यांनी खरेदीच्या 7/12वर नोंदी धरण्यासाठी आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आंदोलनकर्त्याचा आरोप आहे. माण नदीपात्रातून वरील दोघांच्या संगनमताने बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याने शासनाच्या मालमत्तेची लयलूट सुरु आहे. मल्लेवाडी येथील गट क्र.156/2 ब,या जमिनीचे बोगस कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्याची तक्रार आहे.
याबाबत उपजिल्हाधिकारी पुर्नवसनकडून तक्रारदारांनी माहिती घेतली असता सदरचा आदेश क्र.2015/पुर्नव./3/सातारा/149 आर.आर.1002 दि. 20/11/2015 हा सोलापूर येथील कार्यालयाकडून निगर्मित झालेला दिसून येत नसल्याचे जिल्हा पुनर्वसन शाखेकडून कळविण्याल्याने बोगस खरेदी विक्री झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्याचा असून याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचे आंदोलनकर्त्याचे मत आहे. गेली दोन दिवस हे आंदोलन सुरु होते.
शनिवारी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनकर्त्याच्या तक्रारी जाणून घेवून चर्चा केली. व या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी महसूल नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यी समिती नेमण्याचा निर्णय होवून सदर समितीचा चौकशी अहवाल दि. 25 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे सक्त आदेश लेखी पत्रात दिले असून याची प्रत उपोषणकर्त्याना दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण तुर्त स्थगित केले आहे.
या उपोषणामध्ये जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड,तालुकाध्य सुरज फुगारे,विदयार्थी आघाडी तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जिल्हा संघटक मनोज चव्हाण,विभागीय जिल्हाध्यक्ष प्रज्वल शिंदे,अमोल गायकवाड,बालाजी धनवे,संदेश आवताडे,प्रशांत नकाते,अरूण मेटकरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणामध्ये सहभागी झाले होते.
————-
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मारापूर मंडल अधिकारी व देगाव सजेच्या तलाठी यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरु केले होते.
दरम्यान या आमरण उपोषणाची दखल तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी घेवून मंडल अधिकारी व तलाठयाच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी महसूल नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आल्याने तूर्त हे उपोषण स्थगित करण्यात आले.
मारापूर मंडलचे मंडल अधिकारी व देगाव सजेच्या महिला तलाठी यांनी खरेदीच्या 7/12वर नोंदी धरण्यासाठी आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आंदोलनकर्त्याचा आरोप आहे. माण नदीपात्रातून वरील दोघांच्या संगनमताने बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याने शासनाच्या मालमत्तेची लयलूट सुरु आहे. मल्लेवाडी येथील गट क्र.156/2 ब,या जमिनीचे बोगस कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्याची तक्रार आहे.
याबाबत उपजिल्हाधिकारी पुर्नवसनकडून तक्रारदारांनी माहिती घेतली असता सदरचा आदेश क्र.2015/पुर्नव./3/सातारा/149 आर.आर.1002 दि. 20/11/2015 हा सोलापूर येथील कार्यालयाकडून निगर्मित झालेला दिसून येत नसल्याचे जिल्हा पुनर्वसन शाखेकडून कळविण्याल्याने बोगस खरेदी विक्री झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्याचा असून याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचे आंदोलनकर्त्याचे मत आहे. गेली दोन दिवस हे आंदोलन सुरु होते.
शनिवारी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनकर्त्याच्या तक्रारी जाणून घेवून चर्चा केली. व या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी महसूल नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यी समिती नेमण्याचा निर्णय होवून सदर समितीचा चौकशी अहवाल दि. 25 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे सक्त आदेश लेखी पत्रात दिले असून याची प्रत उपोषणकर्त्याना दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण तुर्त स्थगित केले आहे.
या उपोषणामध्ये जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड,तालुकाध्य सुरज फुगारे,विदयार्थी आघाडी तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जिल्हा संघटक मनोज चव्हाण,विभागीय जिल्हाध्यक्ष प्रज्वल शिंदे,अमोल गायकवाड,बालाजी धनवे,संदेश आवताडे,प्रशांत नकाते,अरूण मेटकरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणामध्ये सहभागी झाले होते.
————-
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज