मंगळवेढा : समाधान फुगारे
भाजप व शिवसेना यांच्या सरकारने शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग केला असल्याची टीका खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी केली आहे. ते आमदार भारत भालके यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.
व्यासपीठावर आ.भारत भालके,राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,लतीब तांबोळी, महिला जिल्हाध्यक्षा अनिता नागणे,उमेश पाटील,अँड.शिवानंद पाटील,शेतकरी संघटनेचे समाधान फटे,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर भगरे,नगरसेवक राहुल सावंजी,प्रवीण खवतोडे आदीजन उपस्थित होते.
कोल्हे पुढे बोलताना म्हणाले की,मुख्यमंत्र्याच्या सभेला माणसे शोधून आणावी लागतात आमच्या सभेत माणसे मनानी अली आहेत.भालकेंसाठी तुम्ही कंबर कसून आपला घरातील उमेदवार म्हणून त्यांच्या पाठिशी उभे रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भालके बोलताना म्हणाले की,शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मला निवडून द्या मी तुमचे प्रश्न विधानसभेत तुमचा प्रतिनिधी म्हणून आवाज उठातो.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवेढा येथे आले ३५ गाव योजनेला निधी घोषित करतील असे वाटते पण त्यांनी जनतेची भ्रमनिराशा केली.
सत्ता तुमच्या हातात असताना तुम्ही त्या योजनेला निधी का देऊ शकला नाहीत.मी आमदार झाल्यानंतर ३५० कोटीची कामे केली.मुख्यमंत्री म्हणतात मी पाणी आणले पण लेकरू कुणाचे कोण घेतेय खांद्यावर असा टोला त्यांनी लगावला.
४० गाव योजनेला पाणी दिले.उच्च शिक्षण करून देखील त्यांनी फक्त १२५ संस्था आणि जागा घशात घातल्या.निराधार,अंगणवाडी सेविका, शेतकऱ्यांचे,जेष्ट नागरिक अशा अनेक प्रश्न विधानसभेत मांडून त्याला न्याय मिळवून दिला.देवस्थानच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी मिळवून दिला आहे.
सुधाकरपंतानी अनेका पक्ष बदलले अर्ज रयत क्रांती कडून चिन्ह कमळाचे दुसऱ्यावर आरोप करताना आपण काय केले आधी ते पाहावे.
उमेदवाराला संतांची उपमा दिली पण जिवंत असताना असली उपमा का दिली. साधी बसवेश्वर चोखामेळा स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही आणि सांगताय स्मारक उभारतो.विठ्ठल साखर कारखान्याचे सर्व व्यवहार सुरळीत असताना माझे पैसे अडवून मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रस्तावित पांडुरंग चौगुले, सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर आभार राहुल घुले यांनी मानले.
पावसामुळे कोल्हेचें भाषण थोडक्यात
राष्ट्रवादीचे खासदार खा.डॉ.अमोल कोल्हे यांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जाहीर सभा पावसामुळे त्यांना अवघ्या चारच वाक्यात संपवावी लागली जोरदार पावसामुळे कार्यकर्त्यांची पळापळ सुरू झाली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज