मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे सरकार येताच राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.ते आ.भारत भालके यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथील आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे,जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील,अनिता नागणे,चारुशीला कुलकर्णी,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे,लक्ष्मण पवार, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,सुरेश कोळेकर, शशिकांत पाटील, प्रा.संतोष पवार,लतीब तांबोळी,भारत बेदरे,पी.बी.पाटील,तानाजी काकडे,मुजमिल काझी, प्रज्वल शिंदे,अँड.राहुल घुलेमाजी सभापती संभाजी गावकरे, नगरसेवक राहुल सावंजी,विजय खवतोडे,पांडुरंग नाईकवाडी,प्रवीण खवतोडे, ज्ञानेश्वर भगरे,पांडुरंग चौगुले,विजय देशमुख आदीजन उपस्थित होते.
पवार पुढे बोलताना म्हणाले की,आमचे सरकार आले की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आहे.पाच वर्षात या सरकारने जनतेची घोर निराशा केली.ही निवडणूक महाराष्ट्रातील निवडणूक आहे.मुद्दे देशाचे सांगत आहेत.पाच वर्षापूर्वी त्यांना संधी दिली आमचा १५ वर्षाचा कारभार पारदर्शक होता.या सरकारने शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम केले.शेतमालाला व भाजीपाल्याची काय अवस्था आहे.एवढी बिकट अवस्था करून ठेवली.शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांचे सोने केले पण हे सरकार शेतकरी विरोधी आहे.
या सरकारच्या काळात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शेतकरी संपावर गेले.शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या.एवढं होऊन सुद्धा कोणत्या तोंडाने मते मागायला येत आहेत.७१ हजार कोटीचे कर्ज आम्ही माफ केले होते.सरसकट कर्जमाफीची पोकळ घोषणा केली पण प्रत्यक्षात कर्ज माफी मिळाली नाही. अजूनही शेतकरी प्रतीक्षेत आहेत.कर्ज माफी कशी करायची माज्या काकाला विचारा कशी करायची असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला जादा भाव मिळवून दिला.बँकांची काय अवस्था करून ठेवली आहे.शेतकऱ्यांना पीक कर्ज सुद्धा दिले नाही. दरवर्षी २ कोटी बेरोजगार युवकाना नोकरी मिळवून देतो म्हणून सांगितले किती जणांना नोकऱ्या मिळाल्या.मेगा भरती कसली घेतली हे सगळ्यांनाच माहिती आहे.जी.एस.टी लादून व नोटबंदी करून व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले.दुधाला कमी भाव देऊन यांचा शेती व शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही.कडकनाथ मध्ये भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांना मातीत घातले.शरद पवारांवर या सरकारने अशी अवस्था केली ते जनतेची काय अवस्था करणार असेही ते म्हणाले.
आ.भालके बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा मंगळवेढा येथे झाली त्यांनी तालुक्यासाठी विकासाच्या दृष्टीने काहीच न बोलता ते निघून गेले.३५ गावच्या योजने बद्दल यांनी एक ब्र शब्द ही काढला नाही.अजित पवारांनी लोकवर्गणीतून पैसे भरण्याची अट रद्द करून दुष्काळी भागातील जनतेला पाणी मिळवून दिले.शेतकऱ्यांना वाचवण्याची सरकारची मानसिकता नाही.
लबाड मंत्री सधाभाऊ खोतनी भोसेच्या सभेत जनतेला खोटी माहिती दिली.कमी शिकलो म्हणून कोणाचे काम अडवले नाही.कोणाची भांडणे लावली नाहीत.घरात एक आमदार असताना दुसरा कशाला असा सवाल त्यांनी केला.चुकीच्या पद्धतीने प्रचार करून जनतेची दिशाभूल करत आहेत.त्यांनी एकही विकासात्मक काम न केले नाही.काम कोण करतंय यावर जनता आमदार निवडून देणार आहे.जनता वेगळा बाजूचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्तावित पांडुरंग चौगुले, सूत्रसंचालन इंद्रजीत घुले तर आभार अजित यादव यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज