मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित तालुका मंगळवेढा येथील प्रचार सभेमध्ये रयत क्रांती संघटनेचे राज्याचे नेते माननीय दीपक भोसले यांनी मंगळवेढ्यातील दुर्लक्षित असणाऱ्या दुष्काळी 35 गावाला पाणी फक्त सुधाकरपंत परिचारक आणि देवेंद्र फडणवीस हेच देऊ शकतात त्यामुळे या भागातील नागरिकांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून येत्या 21 तारखेला कमळ या चित्रात समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने परिचारक साहेब यांना विजयी करावे आणि एक वेळ या भागाची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली आहे.
येत्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपल्या भागाला पाणी मिळाले नाही तर पुन्हा आपल्या गावांमध्ये मत मागण्यासाठी मी येणार नाही अशी ग्वाही दिली पुढे बोलताना दीपक भोसले साहेब म्हणाले की मागील दोन निवडणुकीमध्ये ज्या नेतृत्वावर आपण विश्वास टाकला आ.भारत भालके नी आपला गरजेपुरता वापर केला आणि आपल्या पदरी केवळ आणि केवळ निराशा पडली मागील पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पंढरपूर तालुक्याचे सलग पंचवीस वर्षे नेतृत्व केले त्या परिचारक साहेबांच्या कार्यकर्तृत्वाची महिमा ही वेगळे असून महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये सध्या भाजपा शिवसेनेचे सरकार आहे.
या सरकार कडून या भागाचा विकास करण्यासाठी आपल्याला जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्याकरिता आपल्या भागातील लोकप्रतिनिधी सुद्धा सत्तेतील चालला पाहिजे म्हणून डोळस दृष्टीने काळाची पावले ओळखून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी यांनी आपलं उभा आयुष्य समाजाप्रती अर्पित केले आहे आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मध्ये राजकारणातील संत म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली आहे हे ते महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना एक वेळ आपल्या भागाची ची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहनही श्री भोसले यांनी केले.
सदर प्रसंगी पंढरपूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती ती वामनराव माने सर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपुर चे माजी सभापती दाजी पाटील भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजू बापू गावडे शेतकरी संघटनेच्या नेत्या विश्रांती भुसनर यांच्यासह गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक करताना वडगावचे बाळासाहेब सांगोलकर यांनी सर्वांचे स्वागत करून या भागाला पाणी दिल्यास या भागातील जनता आपणास आयुष्यभर विसरणार नाही त्यामुळे आपल्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या गावातून मोठ्या मताधिक्क्याने आपणास निवडून देणार असल्याची ग्वाही दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज