समाधान फुगारे : मंगळवेढा
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाच्या विकासासाठी येथील असणाऱ्या अपुऱ्या योजना पूर्ण करण्यासाठी मी ही निवडणूक लढवणार असल्याचे समाधान आवताडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित विचार विनिमय बैठकीत जाहीर केले आहे.
व्यासपीठावर माजी सभापती भुजंगराव पाटील,माजी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.येताला भगत,समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, जि.प सदस्या मंजुषा कोळेकर, सरपंच विजय माने,इराप्पा पुजारी,सचिन शिवशरण, सभापती प्रदीप खांडेकर,लक्ष्मण जगताप आदीजन उपस्थित होते.
आवताडे पुढे बोलताना म्हणाले की,आपण दिलेल्या जनमतानुसार मी वाटचाल करीत आहे.२०१४ निवडणूकीनंतरच्या अपयशानंतर मी खचून न जाता नवीन उमेद घेऊन जनतेसमोर गेलो.चांगली सेवा करत असल्यामुळेच जनतेने सत्ता केंद्रे हातात दिली.सर्वात जास्त निधी मतदार संघात देता आला.गरजू लोकांन पर्यंत योजना पोहोचवत असताना.अनेक समस्या येत होत्या.गेल्या पाच वर्षात सगळ्या समस्याचा मी अभ्यास केला असून या सर्व समस्या मी मार्गी लावल्या आहेत.
कोणतीही सत्ता नसताना मी बेरोजगार तरुणांना काम दिले आहे.पक्ष असो या अपक्ष जनता मला नक्किच साथ देणार असून जनतेसमोर जाऊन मी केलेल्या कामाची पोच पावती मिळेल.राजकारणाच्या आखाड्यात मी गेली पाच वर्षे झाले आलो आहे.कुस्ती खेळण्या ऐवजी वस्ताद होयला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्या सकाळी १० वाजता गावातील ग्रामदेवत व दामाजी पंत,पांडुरंगाचे दर्शन घेऊन मी अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अँड.दत्तात्रय तोडकरी,पंढरपूरचे अमित यादव,सत्यवान रोंगे,औदुंबर शिंदे,प्रा.संतोष मिसाळ,विनोदी लटके,भुजंगराव पाटील,शेखर भोसले,दत्तात्रय जमदाडे,प्रा.येताला भगत यांनी मनोगत व्यक्त केली.
समाधान फुगारे : मंगळवेढा
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाच्या विकासासाठी येथील असणाऱ्या अपुऱ्या योजना पूर्ण करण्यासाठी मी ही निवडणूक लढवणार असल्याचे समाधान आवताडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित विचार विनिमय बैठकीत जाहीर केले आहे.
व्यासपीठावर माजी सभापती भुजंगराव पाटील,माजी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.येताला भगत,समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, जि.प सदस्या मंजुषा कोळेकर, सरपंच विजय माने,इराप्पा पुजारी,सचिन शिवशरण, सभापती प्रदीप खांडेकर,लक्ष्मण जगताप आदीजन उपस्थित होते.
आवताडे पुढे बोलताना म्हणाले की,आपण दिलेल्या जनमतानुसार मी वाटचाल करीत आहे.२०१४ निवडणूकीनंतरच्या अपयशानंतर मी खचून न जाता नवीन उमेद घेऊन जनतेसमोर गेलो.चांगली सेवा करत असल्यामुळेच जनतेने सत्ता केंद्रे हातात दिली.सर्वात जास्त निधी मतदार संघात देता आला.गरजू लोकांन पर्यंत योजना पोहोचवत असताना.अनेक समस्या येत होत्या.गेल्या पाच वर्षात सगळ्या समस्याचा मी अभ्यास केला असून या सर्व समस्या मी मार्गी लावल्या आहेत.
कोणतीही सत्ता नसताना मी बेरोजगार तरुणांना काम दिले आहे.पक्ष असो या अपक्ष जनता मला नक्किच साथ देणार असून जनतेसमोर जाऊन मी केलेल्या कामाची पोच पावती मिळेल.राजकारणाच्या आखाड्यात मी गेली पाच वर्षे झाले आलो आहे.कुस्ती खेळण्या ऐवजी वस्ताद होयला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्या सकाळी १० वाजता गावातील ग्रामदेवत व दामाजी पंत,पांडुरंगाचे दर्शन घेऊन मी अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अँड.दत्तात्रय तोडकरी,पंढरपूरचे अमित यादव,सत्यवान रोंगे,औदुंबर शिंदे,प्रा.संतोष मिसाळ,विनोदी लटके,भुजंगराव पाटील,शेखर भोसले,दत्तात्रय जमदाडे,प्रा.येताला भगत यांनी मनोगत व्यक्त केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज