मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
माचणूर येथील प्रतीक शिवशरण या शाळकरी मुलाची झालेली निर्घुन हत्या या पार्श्वभूमीवर जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी शुक्रवारी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
यामध्ये त्यांनी प्रतीक शिवशरण यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक व्हावी, त्याचा अवयव अद्याप सापडला नसून त्याचा शोध घ्यावा व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना निलंबित करावे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांची त्वरित बदली करावी या मागण्यांसाठी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्याकडून माहिती घेतली असता. त्यांनी सांगितले की,या प्रकरणाचा तपास चार पथकांकडून वेगात सुरू आहे. काही तांत्रिक व वैज्ञानिक बाबी तपासणीचे काम सुरू आहे. लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोलिसांचे हात पोहोचतील व पोलिस निरीक्षकांच्या निलंबनाबाबत वरिष्ठांना या मागणीबाबतचे पत्र पाठवण्यात येईल असे सांगत ही घटना अतिशय गंभीर असून या घटनेचा छडा लागण्यासाठी पोलीसाची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे असे सांगितले.
दरम्यान हे धरणे आंदोलन सायंकाळी चार वाजता सुरू झाले असून रात्री दहा वाजेपर्यंत तर आंदोलन सुरूच होते.
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
माचणूर येथील प्रतीक शिवशरण या शाळकरी मुलाची झालेली निर्घुन हत्या या पार्श्वभूमीवर जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी शुक्रवारी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
यामध्ये त्यांनी प्रतीक शिवशरण यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक व्हावी, त्याचा अवयव अद्याप सापडला नसून त्याचा शोध घ्यावा व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना निलंबित करावे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांची त्वरित बदली करावी या मागण्यांसाठी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्याकडून माहिती घेतली असता. त्यांनी सांगितले की,या प्रकरणाचा तपास चार पथकांकडून वेगात सुरू आहे. काही तांत्रिक व वैज्ञानिक बाबी तपासणीचे काम सुरू आहे. लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोलिसांचे हात पोहोचतील व पोलिस निरीक्षकांच्या निलंबनाबाबत वरिष्ठांना या मागणीबाबतचे पत्र पाठवण्यात येईल असे सांगत ही घटना अतिशय गंभीर असून या घटनेचा छडा लागण्यासाठी पोलीसाची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे असे सांगितले.
दरम्यान हे धरणे आंदोलन सायंकाळी चार वाजता सुरू झाले असून रात्री दहा वाजेपर्यंत तर आंदोलन सुरूच होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज