मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पन्नास वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून काम करत आलो असून पक्षाच्या भूमिकेशी मी आजपर्यंत ठाम असल्याने मला पक्षाने उमेदवारी दिली असून माझा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे उमेदवार प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले.ते ब्रम्हपुरी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलत होते.अध्यक्षस्थानी ब्रम्हपुरी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सज्जन पाटील होते.यावेळी व्यासपीठावर प्रताप पाटील,
डाॅ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाडसरपंच मनोज पुजारी,शेखर कोकरे उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,आता मला या निवडणुकीत विजय मिळायला काहीच अडचण नसून काँग्रेसचे निष्ठावंत मला विधानसभेत पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.
काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत असल्याने मला उमेदवारी मिळाली.परंतु काही विपरीत प्रवृत्तीच्या लोकांनी माझ्याबद्दल अपप्रचार केला.परंतु मला मंगळवेढा येथील जनतेवर विश्वास असून कोणाच्याही भुलथापाला येथील जनता भुलणार नसून मलाच निवडून देणार आहे कारण मी आजपर्यंत पक्षाच्या भूमिकेशी ठाम असल्याने मला पक्षाने उमेदवारी दिली आहे. जनता नक्कीच माझ्या भूमिकेचा विचार करतील अशी मला आशा आहे असेही प्रतिपादन शेवटी काळुंगे यांनी केले.
उस्मानाबाद जिल्ह्या काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षा डाॅ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड बोलताना म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाची भूमिका ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे.काँग्रेस पक्षच हा देशात शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण करू शकतो.काळुंगे सरांच्या कामापेक्षा आपले काम चांगले असेल तर त्याचे उत्तर कामातून द्या परंतु चुकीच्या वावड्या उठवू नका.विरोधकांनी सरांबद्लल चुकीच्या आफवा पसरलेल्या आहेत.ते कोठेही पळून गेलेले नव्हते तर ते कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थाळावर दर्शनाला गेले होते.त्यामुळे चुकीच्या अपप्रचाराला बळी न पडता आपण काँग्रेसच्या चिन्हावर मतदान करून प्रा.काळुंगे यांना विजयी करा असे आवाहन राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनी केले.
ब्रम्हपुरीचे सरपंच मनोज पुजारी बोलताना म्हणाले की,स्वंतत्र प्राप्तीनंतर देश प्रगतीपथावर नेण्यासाठी काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले.खर्या अर्थाने राजीव गांधी यांनी देशात टेक्नीकल युग आणले आहे.परंतु आज हे विरोधक सर्व योजना धूळीला मिळवत आहेत. त्याच पक्षाचे निष्ठावंत म्हणून प्रा. शिवाजीराव काळुंगे यांना पक्षाने उमेदवारी दिली.पतसंस्थेच्या माध्यमातून ते सर्वसामान्य कुटूंबाला धर्ये देण्याचे काम सरांनी केले आहे. पाणी परिषदेच्या माध्यमातून काळुंगे सरांनी उत्कृष्ट काम केले आहे. सामाजिक जाणविचे भान असणारे काळुंगे सर असल्याने त्यांना यावेळी विजयी करण्याचे आवाहन पुजारी यांनी केले.
यावेळी संजय पाटील, गरंडे सर आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच बबनराव सरवळे, प्रकाश काळुंगे, संजय पाटील, शेखर कोकरे,सुनिल पाटील, दिलीप कलुबर्मे, दत्तात्रय चव्हाण, पांडूरंग पुजारी, उत्तम पवार,अशोक मोरे,माणिक कोळी,सत्तार इनामदार, रावसाहेब पाटील, दत्तात्रय पुजारी, विलास पाराध्ये, बाळासाहेब मोरे,बंडूनाना पाटील, उत्तम पाटील,सचिन कलुबर्मे, हरि बेदरे,मस्तान मुल्ला,सिध्देश्वर
सरवळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पन्नास वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून काम करत आलो असून पक्षाच्या भूमिकेशी मी आजपर्यंत ठाम असल्याने मला पक्षाने उमेदवारी दिली असून माझा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे उमेदवार प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले.ते ब्रम्हपुरी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलत होते.अध्यक्षस्थानी ब्रम्हपुरी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सज्जन पाटील होते.यावेळी व्यासपीठावर प्रताप पाटील,
डाॅ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाडसरपंच मनोज पुजारी,शेखर कोकरे उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,आता मला या निवडणुकीत विजय मिळायला काहीच अडचण नसून काँग्रेसचे निष्ठावंत मला विधानसभेत पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.
काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत असल्याने मला उमेदवारी मिळाली.परंतु काही विपरीत प्रवृत्तीच्या लोकांनी माझ्याबद्दल अपप्रचार केला.परंतु मला मंगळवेढा येथील जनतेवर विश्वास असून कोणाच्याही भुलथापाला येथील जनता भुलणार नसून मलाच निवडून देणार आहे कारण मी आजपर्यंत पक्षाच्या भूमिकेशी ठाम असल्याने मला पक्षाने उमेदवारी दिली आहे. जनता नक्कीच माझ्या भूमिकेचा विचार करतील अशी मला आशा आहे असेही प्रतिपादन शेवटी काळुंगे यांनी केले.
उस्मानाबाद जिल्ह्या काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षा डाॅ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड बोलताना म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाची भूमिका ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे.काँग्रेस पक्षच हा देशात शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण करू शकतो.काळुंगे सरांच्या कामापेक्षा आपले काम चांगले असेल तर त्याचे उत्तर कामातून द्या परंतु चुकीच्या वावड्या उठवू नका.विरोधकांनी सरांबद्लल चुकीच्या आफवा पसरलेल्या आहेत.ते कोठेही पळून गेलेले नव्हते तर ते कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थाळावर दर्शनाला गेले होते.त्यामुळे चुकीच्या अपप्रचाराला बळी न पडता आपण काँग्रेसच्या चिन्हावर मतदान करून प्रा.काळुंगे यांना विजयी करा असे आवाहन राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनी केले.
ब्रम्हपुरीचे सरपंच मनोज पुजारी बोलताना म्हणाले की,स्वंतत्र प्राप्तीनंतर देश प्रगतीपथावर नेण्यासाठी काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले.खर्या अर्थाने राजीव गांधी यांनी देशात टेक्नीकल युग आणले आहे.परंतु आज हे विरोधक सर्व योजना धूळीला मिळवत आहेत. त्याच पक्षाचे निष्ठावंत म्हणून प्रा. शिवाजीराव काळुंगे यांना पक्षाने उमेदवारी दिली.पतसंस्थेच्या माध्यमातून ते सर्वसामान्य कुटूंबाला धर्ये देण्याचे काम सरांनी केले आहे. पाणी परिषदेच्या माध्यमातून काळुंगे सरांनी उत्कृष्ट काम केले आहे. सामाजिक जाणविचे भान असणारे काळुंगे सर असल्याने त्यांना यावेळी विजयी करण्याचे आवाहन पुजारी यांनी केले.
यावेळी संजय पाटील, गरंडे सर आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच बबनराव सरवळे, प्रकाश काळुंगे, संजय पाटील, शेखर कोकरे,सुनिल पाटील, दिलीप कलुबर्मे, दत्तात्रय चव्हाण, पांडूरंग पुजारी, उत्तम पवार,अशोक मोरे,माणिक कोळी,सत्तार इनामदार, रावसाहेब पाटील, दत्तात्रय पुजारी, विलास पाराध्ये, बाळासाहेब मोरे,बंडूनाना पाटील, उत्तम पाटील,सचिन कलुबर्मे, हरि बेदरे,मस्तान मुल्ला,सिध्देश्वर
सरवळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज