मंगळवेढा टाईम्स न्युज कंपनी। समाधान फुगारे
भिमा नदी पात्रातून बठाण व उचेठाण येथे ठेकेदाराकडून दिवस रात्र सुरु असलेला वाळू उपसा तात्काळ बंद करुन गौणखनिजच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी ठेकेदार व महसूल अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी दामाजी चौकातून पुतळा ते तहसिल कार्यालय पर्यत हालगी मोर्चा काढून बोंब मारो आंदोलन करण्यात आले.
तसेच प्रहार संघटनेकडून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण देखील सुरू आहे त्यामुळे अवैध वाळू उपसा प्रकरणी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली असून याप्रकरणी आता आमदार समाधान आवताडे यांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
वाळू ठेकेदाराकडून बठाण व उचेठाण येथील भिमा नदी पात्रातील वाळूचा गाळमिश्रीत ठेक्यातील वाळू रात्रभर टिपर वाळू नेत असल्याने चक्क शासनाच्या मालमत्तेवर दरोडा टाकला जात आहे.
घरकूलसाठी वाळू न देता सांगली, कोल्हापूर या भागातील लोकांना वाळू देवून येथील लाभार्थ्यांला वंचीत ठेवले जात आहे. घरकूलचे सर्व्हर अनेकवेळा प्रयत्न करुनही सुरू होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
घरकूलच्या नावाखाली चक्क भिमा नदी गिळून टाकली जात असल्याचा आरोप आंदोलकांचा होता. वाळू ठेका बंद करणेबाबत निवेदन देवूनही महसूल अधिकार्यांनी कोणतीच कारवाई न केल्यामुळे आंदोलकावर मोर्चा काढण्याची वेळ आली. भविष्यात वाळू उपसा न थांबल्यास आणखीन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
उचेठाण येथून मंगळवेढा शहर, भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा,आंधळगाव पाणी पुरवठा,जलजीवन व स्थानिक पाणी पुरवठे,तसेच को.प.बंधारा असल्यामुळे येथे यारीच्या सहाय्याने वाळू उपसा केल्यानंतर पाणी गढूळ होत असल्याने तेच पाणी नारिकांना पिण्यासाठी नळाव्दारे येत आहे. भविष्यात नागरिकांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण ? असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला आहे.
मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आमदार समाधान आवताडे यांनी त्वरित लक्ष घालावे अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
आत्मदहन करणार
अवैध वाळू उपसा प्रकरणी संबंधित ठेकेदारवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मी माझे आंदोलन सुरू ठेवणार असून आत्मदहन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खंदारे यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी
दि 2 मे रोजी उचेठाण येथे 243 ब्रास व बठाण येथे 300 च्या वर वाळु साठा होता पण काही कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयातुन आँनलाईन साईट बंद ठेवली होती पण तरीही तेथील वाळू ठेकेदारांनी 3 मे ला सकाळी सगळी वाळु बिगर पावतीचे टिपर व ट्रक भरुन लंपास केली यावर अधिकारी एकही बोलत नाही.
काल पुन्हा दिवस भर वाळु उपसा मोठ्या प्रमाणावर चालू आहे हे बंद झाले पाहिजे कारण याभागात एकही अधिकारी का जात नाही याची चौकशी जिल्हाधिकाय्रांशी करावी अशी मागणी ही करणार आहे.-सिदराया माळी, प्रहार दिव्यांग क्रांती जिल्हा उपाध्यक्ष.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज