टीम मंगळवेढा टाईम्स ।
मासिक सर्वसाधारण सभा घेतल्याच्या कारणावरून मोहोळ तालुक्यातील सय्यदवरवडे येथे सरपंच वाल्मिकी जालिंदर निळे यांच्यावर हल्ला करण्यात आला.
याप्रकरणी मोहोळ पोलिसांत पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राजेंद्र औदुंबर विरपे, अंकुश ऊर्फ भाऊ मारुती कदम, देवीदास भिवा कदम, सोमनाथ विलास विरपे, बाळू भिवा कदम (सर्व रा. सय्यदवरवडे, ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सय्यदवरवडे ग्रामपंचायतीची सरपंच निवड गेल्या 23 फेब्रुवारी रोजी पार पडली आहे.यात वाल्मिकी जालिंदर निळे यांची सरपंच, तर पमाबाई शंकर कोरे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातील गट नाराज होता.
दरम्यान, 10 मार्च रोजी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली मासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला जात असताना ग्रामपंचायत कार्यालयाच्या पोर्चमध्ये दरवाजात उभ्या असलेल्या संशयितांसह विरोधी गटाच्या काहीजणांनी सरपंच निळे यांना अडविले.
त्यांना, तू मिटिंगला जायचे नाही, असे बजावत त्यांना ओढून बेदम मारहाण केली.यावेळी शिवराज निळे यांच्यासह काहीजण त्यांना सोडवायला आले. परंतु संबंधितांनी त्यांनाही बेदम मारहाण केली.
या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सय्यदवरवडे येथे धाव घेतली. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. त्यांनी याप्रकरणी चौकशी करून मोहोळ पोलिसांत हल्ला करणार्या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज