टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
राज्यभरातील अवकाळी पावसाचे ढग आता विरले असले तरी किंचित प्रभाव म्हणून २ डिसेंबरपर्यंत राज्यभरात ठिकठिकाणी तुरळक पावसाची हजेरी लागू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
विदर्भातील ११ व खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव या तीन जिल्ह्यांसह एकूण १४ जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दोन दिवस आहे.
मुंबईसह कोकण, मराठवाड्यासह उर्वरित राज्यांतील २२ जिल्ह्यांत २ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात गारपिटीची शक्यता कुठेच नाही, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
मराठवाड्यात गेल्या तीन दिवसांत ६१ मिमी. पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या पावसाने मराठवाड्यातील ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे.
नांदेड जिल्ह्यातही २४ तासांत सरासरी २०.९० मिमी. पावसाची नोंद झाली असून ३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. मात्र, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने तोडणीला आलेला ऊस तसेच ज्वारी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हरभरा, तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.
द्राक्षाच्या फळबागेसह, भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे ५३ हजार ९७९ हेक्टरवरीलर पिकांचे नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यात मात्र, बुधवारी पावसाने उघडीप दिली.
सोलापुरात नाल्यात वाहून गेल्यानं तरुणाचा मृत्यू
मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसात दुचाकीवरून घरी परतणारा दुचाकीस्वार कुंभार वेस येथील नाल्यात दुचाकीसह वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दोन्ही मित्रांनी त्याला नाल्यातून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. सलाम साबीर दलाल (वय ३५, मंगळवार बाजार, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आणखीन तीव्र झाली आहे. यामुळे 2 डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मिचांग चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
या चक्रीवादळामुळेच अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तसेच महाराष्ट्रातील काही भागात गारपीट होईल. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांसाठी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
दरम्यान, पुढील काही तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि जळगाव या भागात देखील मेघगर्जना होऊ शकते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज