टीम मंगळवेढा टाईम्स।
किसन वीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील शेतकरी सभासद ऊस गाळपासाठी आणत आहेत. कारखान्यामध्ये ऊसः वाहतुक करणाऱ्या वाहनांचे वजन साधारणतः 22 ते 25 मेट्रिक टनापर्यंत असते.
परंतु अक्षय कृष्णदेव पवार या ट्रॅक्टर मालकाने 47.541 मेट्रिक टन निव्वळ ऊस आणल्याने किसन वीर कारखान्याचा काटा लॉक झाला.
या वाहन मालकाने आणलेल्या ऊसाचे काैतुक म्हणून कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी अक्षय पवार व वाहन चालक संदिप दिलीप साबळे यांचा शॉल, श्रीफळ, पेढे देऊन यथोचित सत्कार केला.
किसन वीर व खंडाळा कारखाना आर्थिक गर्तेत सापडल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद हतबल झालेला दिसून येत होता.
View this post on Instagram
पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच मे 2022 मध्ये कारखान्याच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याची सुत्रे वाई- खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांच्याकडे आली.
शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासावर किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने वेळेत सुरू करून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पहिला अॅडव्हान्स जमाही झाला. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येऊ लागला. कारखान्याचे गाळपही व्यवस्थितपणे सुरू आहे.
शुक्रवारी सुरज रामदास येवले पांडेवाडी (ता.वाई) या शेतकऱ्याच्या शेतातील ऊस अक्षय कृष्णदेव पवार यांच्या वाहनातून आणण्यात आला. या वाहनाचे भर वजन 56.180 मेट्रिक टन असून निव्वळ ऊसाचे वजन 47.541 मेट्रिक टन भरल्याने काट्यावर वजनच करता आले नाही व काटा लॉक झाला.
अक्षय पवार यांच्या सत्कारप्रसंगी कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगुडे, मुख्य शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, खंडाळा कारखाना शेती अधिकारी अशोक घाडगे, केनयार्ड सुपरवायझर हणमंत निकम, अरविंद नवले,
संदीपशेठ बाबर, अजय भोसले, विजय शिंगटे, सुजितसिंह जाधवराव, सचिन निकम, मामा पाटील, गिरीश कडाळे, ज्ञानेश्वर महामुनी आदी उपस्थित होते.(स्रोत:हॅलो महाराष्ट्र)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज