टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्याला वरदायी ठरणाऱ्या उजनी धरणाचे पाण्याची पातळी चिंताजनक असून मार्च पहिल्या आठवड्यात वजा १७ टक्के पाणीसाठा आहे. १० मार्च नंतर पंढरपूर, सोलापूर, मंगळवेढा या शहरासाठी व नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.
यंदाच्या वर्षी उजनी धरण जेमतेम फक्त ६० टक्के भरले होते. यातील शेतीला आणि औद्योगिक क्षेत्राला पाणी सोडल्यामुळे सहा महिन्यात ३२ टीएमसी पाणी संपले.
एक मार्चच्या दरम्यान उजनीची पाण्याची पातळी वजा १७ टक्के इतकी होती. उजनीतील पाणी हे आता पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
सध्या पंढरपूरला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे तसेच सोलापूरला सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
यासाठी आता सोलापूर व पंढरपूरला जेमतेम दहा दिवस पुरेल एवढेच पाणी बंधाऱ्यात आहे. यामुळे १० मार्चनंतर पाणी सोडण्यात येणार असल्याचे माहिती जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज