मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील ज्ञानेश्वर भोरकडे (वय ३५) यास जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी सभापती पतीसह १३ जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान,दोन गटात एकमेकाविरूध्द गुन्हे दाखल झाल्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा जादा फोर्स तैनात करण्यात आला राहते असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.
पोलिस सत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी ज्ञानेश्वर भोरकडे यास दि.२ मार्च रोजी रात्री ७.४५ वा. यातील आरोपी मधुकर बिराप्या गंगमई,सभापती पती सुधाकर रेवाप्या मासाळ,दत्तात्रय रेवाप्या शेजाळ,श्रीकांत रेवाप्पा मासाळ,मारुती बयाजी कोटे,शामराव रामचंद्र गंगमई,बप्पाण्णा जकवडर,शामराव म्हाळाप्पा येड्डे, परशुराम बिराप्पा गंगमई,काशिनाथ हुगार, हुवाण्णा रेवाप्पा बंडगर,बिराप्पा शिवाप्पा कोटे, आकाश सिध्द मासाळ,महादेव जक्कू कोटे (सर्व रा.हलजंती) आदीनी संगनमत करून बेकायदा तणावपूर्ण जमाव जमवून फिर्यादी ज्ञानेश्वर भोरकडे याचे भिमनगर येथील राहते घरासमोर फिर्यादी व त्यांचे नातेवाईक यांना जातीवाचक शिवीगाळ करून गावात राहू देणार नाही अशी धमकी देवन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तसेच फिर्यादीचे महिला नातेवाईक यांच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे ज्ञानेश्वर भोरकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.या गुन्हयाचा तपास डी. वाय.एस.पी. दत्तात्रय पाटील हे करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत दत्तात्रय रेवाप्पा शेजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत आरोपी ज्ञानेश्वर भोरकडे,दादा भारत सोनवले,अविनाश विनायक भोरकडे,कृष्णा बापू भोरकडे,उमेश काटे,गोविंद भोरकडे,मिनाक्षी कृष्णा भोरकडे,रंभा गैबी भोरकडे या सर्व आरोपींनी दि.२ फेब्रुवारी रोजी रात्री ८.०० वा. फिर्यादीचे हॉटेल गुरुकृपासमोर येवून ज्ञानेश्वर भोरकडे याला गरम भजी करून लवकर का दिली नाहीत असे म्हणून हॉटेलमध्ये येवून हॉटेलचे कौऊंटर फोडून व ठेवलेला चिवडा,लाडू फेकून देवून ३ हजार रुपयांचे नुकसान केले तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने व चप्पलने मारहाण केली.
या भांडणात फिर्यादीच्या गळ्यातील चेन व पैसे पडून गहाळ झाल्याचे फिर्यादी दत्तात्रय शेजाळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान या दोन घटनेमुळे गावात शांततापूर्ण तणाव आहे.मंगळवारी हुलजंती येथील आठवडी बाजार असतो.तो आज तणावपूर्ण वातावरणामुळे भरू शकला नाही.गावात शांतता रहावी यासाठी डी. वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील व पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे,एक स्ट्रायकिंग फोर्स सह तळ ठोकून आहेत.गावात शांतता रहावी यासाठी पोलिस प्रशासन गावातील नागरिकांची बैठक घेवून शांतता राखण्याचे आवाहन करीत आहेत.
दरम्यान रात्री ज्ञानेश्वर भोरकडे यांनी दिलेल्या फिर्यादी जबाबत सभापती पती सुधाकर रेवाप्पा मासाळ यांचे नाव घालण्यात आले होते.मात्र संबंधित ठाणे अंमलदार याने त्यांचे नाव गायब केल्याने गोंधळ उडाला. हुलजंती गावातून दोन जीपगाडया पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना भेटण्यास गेल्या होत्या,पोलिस अधिक्षक उपस्थित नसल्यामुळे आरोपी सुधाकर मासाळ यांचे नाव वगळल्याची तक्रार अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांचेकडे केल्यानंतर रात्री उशीरा पुरवणी जबाब घेवून सुधाकर मासाळ यांचे नाव समाविष्ट करण्यात आले.या प्रकारामुळे पोलिस ठाण्यातील सावळा गोंधळ उजेडात आला आहे.पोलिस अधिक्षक मनोज पाटील आरोपीचे नाव वगळल्याप्रकरणी संबंधित ठाणे अंमलदारावर कोणती कारवाई करणार याकडे तमाम नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.पहिल्या फिर्यादी जबाबात आरोपी सुधाकर मासाळ यांचे नाव असल्याची फिर्यादी झेरॉक्स प्रत गोविंद भोरकडे यांनी प्रसार माध्यमांकडे देवून ठाणे अंमलदार याने जाणीवपूर्वक नाव वगळल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज