मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सराफ बाजारातील साई ज्वेलर्स या दुकानातून बारा तोळे दागिने घेऊन त्याचे पैसे न दिल्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.निर्मला हरिदास माने (रा. कुरूल ता. मोहोळ) , स्वप्नजा कोळी (निर्मिती विहार, सोलापूर) यांच्यावर जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नवीन माळी यांनी आज तक्रार दिली आहे.
२०१५ ते २०१६ या कालावधीत ही घटना घडली आहे. माळी यांच्या दुकानातून माने यांनी २०१५ साली सोने खरेदी केले होते. त्या देना बँक, सोलापूर शाखेत लिपिक म्हणून कामाला असल्याचे सांगितले होते. तर कोळी त्यांची मुलगी आहे. माने व माळी यांच्या ओळखीच्या माध्यमातून आणि विश्वास संपादन करून वर्षभराच्या कालावधीमध्ये बारा तोळे दागिने घेतले.
त्याची मूळ किंमत तीन लाख ७० हजार रुपये होते. टप्प्याने पैसे देण्याचे ठरले होते. त्यापोटी ७५ हजार रुपये सुरुवातीला दिले. पण उर्वरित दोन लाख ९४ हजार रुपये वारंवार मागणी करूनही दिले नाहीत. माने यांनी मी बँकेतून रिटायरमेंट झाल्यानंतर फंडातून आलेले पैसे काढून तुमचे पैसे देते असे सांगितले होते. त्यानंतरही पैसे दिले नाहीत. त्यांना बँकेत व घरी भेटण्याचा प्रयत्न केला. भेट झाली नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज