मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोल्हापूर जिल्ह्यात दुध व्यवसायात मोठ्या प्रमाणात महिलांचे योगदान आहे. यावरच ग्रामीण आर्थिक व्यवस्था टिकून आहे. यामुळे दुधाला लवकरच आम्ही चांगला भाव देणार आहोत. या व्यवसायामध्ये नवी संकल्पना ‘उमेद’ने आणावी ती महिलांसाठी संजीवनी ठरणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्राम विकास व पंचायत राज अभियान, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तपोवन मैदानावर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण मेळाव्यात ते बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना आरक्षण मिळाल्यापासून त्या सक्षमपणे काम करीत आहेत.तसेच कोल्हापूर जिल्ह्यात दूध व्यवसायात मोठ्या प्रमाणात महिलांचे योगदान आहे. यावरच ग्रामीण आर्थिक व्यवस्था टिकून आहे. यामुळे दुधाला लवकरच आम्ही चांगला भाव देणार असल्याचे पाटील यांनी सांगीतले.
जिल्हा परिषदेमध्ये महिलाराज आहे. बचत गटाच्या अध्यक्ष ही नवी ओळख पुढे आली आहे. असंघटीतपणे काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्याचे मुल्यमापन होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेमधील काही अटी बदलाव्या लागतील. बचत गटांना मिळणाऱ्या निधीचा वापर महिलांनी उद्योग, व्यवसायासाठी करुन विकासात हातभार लावावा, असेही पाटील म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज