मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चारा छावणीस ऊस गेल्यामुळे कारखाना मोठया संकटात असताना सुध्दा ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुक ठेकेदार व कामगार यांच्या विश्वासावर चांगल्या प्रकारे चालवला असे मत साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभप्रसंगी चेअरमन समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.कारखाना कार्यस्थळावर प्रारंभी कारखान्याचे तज्ञ संचालक विजय धानाप्पा माने व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैष्णवी विजय माने या उभयतांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यांत आली.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे म्हणाले की,चालु गळीत हंगामामध्ये 1,62,050 लाख मे.टन ऊस गाळप करुन 1,56,800 Ïक्वटल पोती साखरेचे उत्पादन झाले आहे.सरासरी 9.90 टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे.कारखाना चांगल्या कार्यक्षमतेने चालविल्याने सव शेतकरी बंधु, अधिकारी , कामगार व ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार यांचे आभार मानले. 27 व्या गळीत हंगामात कोणत्याही बँकेचे एक रुपयाही कर्ज न घेता कारखाना सुरु केला. कामगार व व्यापायांची मोठया प्रमाणात देणी होती कारखाना सुरु होतो की नाही असे वाटत होते. दामाजी कारखाना शेतकयांचा असल्याने संपूर्ण ऊसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करावयाचा नाही असा निर्णय संचालक मंडळांनी घेवून आज संपूर्ण ऊसाचे गाळप करुन सांगता समारंभाचे आयोजन केले आहे. शेतकयांचे नुकसान होवू नये म्हणून कमी रिकव्हरीचा ऊस गाळपास आणला. येणाया भविष्यात कामगारांचे सर्व प्रश्न सोेडविण्यात येतील असेही त्यांनी सांगितले अत्यंत अडचणीच्या काळात कामगारांनी कारखाना चांगल्या प्रकारे चालविल्याने कामगारांना सात दिवसाचा पगार बक्षीस म्हणून जाहीर केला. व्यापायांनीही आमच्यावर विश्वास ठेवून माल दिला. असाच आमच्यावर दृढ विश्वास रहावा हीच श्री संत दामाजी चरणी प्रार्थना केली. तसेच पुढील हंगामाकरिता ऑफ सिझनमधील सर्व कामे कामगारांनी वेळेवर पूर्ण करावी असे त्यांनी आवाहन केले.
कारखान्याच्या सभासदांना गुढीपाडवा 2020 करिता रुपये दहा प्रति किलो दराने प्रति शेअर्स 30 किलोप्रमाणात विक्री करणेत येणारी साखर दिनांक 13/3/2020 पासुन मंगळवेढा व कारखाना साईटवरील साखर वाटप केंद्रावर वाटप करणेत येईल.
पुुढील हंगामासाठी तालुक्यामध्ये ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात वाढलेले आहे.तसेच उजनी धरणामध्येही पुरेसे पाणी असल्याने पुढील गळीत हंगामामध्ये आपल्या कारखान्यास मोठया प्रमाणात गळीतासाठी ऊस उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे तोडणी वाहतुक ठेकेदार,बैलगाडी व डंपींग ट्रॅक्टर ठेकेदार, वाहन मालक,मुकादम,मजूर यांचा बक्षीस देवून सत्कार करण्यांत आला.
कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये ते म्हणाले की पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऊसाचे एकरी टनेज कमी असलेमुळे व गळीतास आलेल्या ऊसापैकी काही प्रमाणात ऊस खराब व निकृष्ठ प्रतिचा असल्याने कारखान्याचा साखर उतारा कमी राहिला. परंतु संचालक मंडळांनी अत्यंत काटेकोरपणे व्यवस्थापन केल्याने व त्यास कामगारांनी सहकार्य केल्याने गाळप हंगाम चांगल्या प्रकारे पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी हे होते.यावेळी कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप,रामकृष्ण चव्हाण,शिवयोग्याप्पा पुजारी, सचिन शिवशरण, भुजंगा आसबे, बाळासाहेब शिंदे, लक्ष्मण नरुटे,अशोक केदार, बसवेश्वर पाटील तसेच चंद्रकांत पडवळे,प्रा.येताळा भगत, कारखान्याचे अधिकारी सुहास शिनगारे, रमेश गणेशकर, रमेश पवार, दगडू फटे, संतोष माळवदे,आप्पासोा शिनगारे, लक्ष्मण बेदरे, विजय देशमाने, प्रकाश पाटील, विश्वास पवार, बँक तपासणीस दिलीप पाटील, विठ्ठल गायकवाड, उत्तम भुसे, सर्व कर्मचारी,सभासद,शेतकरी, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हा गळीत हंगाम यशस्वी करणेसाठी कारखान्याचे सभासद,शेतकरी, अधिकारी,कर्मचारी तोडणी वाहतुक ठेकेदार, बैलगाडी मुकादम, ऊस तोडणी मजुर, सिझन कंत्राटी कामाचे ठेकेदार यांनी मोलाचे सहकार्य केले.या सर्वांचे मोठे योगदान मिळालेले आहे. कार्यक्रमाचे शेवटी सर्व उपस्थितांचे आभार संचालक सुरेश भाकरे यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज