मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड -मनमाड दरम्यान अभियांत्रिकी कामांमुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात अाल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्या तीन जानेवारीपासून तीन महिन्याकरिता काही रेल्वे रद्द तर काही आंशिक रद्द करण्यात आल्या होत्या. अाता त्याचा अवधी येत्या ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. निजामाबाद पॅसेंजर, निजामाबाद-पुणे पॅसेंजर, साईनगर-पंढरपूर एक्स्प्रेस, पंढरपूर-साईनगर एक्स्प्रेस, मुंबई-साईनगर एक्स्प्रेस, साईनगर-मुंबई एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या अाहेत. तर नांदेड-दौंड पॅसेंजर गाडी कोपरगाव स्थानकापर्यंत धावेल.
कोपरगाव-दौंड दरम्यान धावणार नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज