मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रासह देशातील करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्यानं केंद्राबरोबर राज्यातील सरकारांकडून लोकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधताना आज (२२ मार्च) जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) पाळण्याचं आवाहन केलं होतं. या कर्फ्यूला पहाटे सुरूवात झाली असून मोदी यांनी पुन्हा एकदा या सहभागी होण्याचं आवाहन ट्विटरवरून केलं आहे.
◼️लोक घरात, गर्दी गायब; पुणे-मुंबईतील रस्ते पडले ओस
जनता कर्फ्यूला महाराष्ट्रातूनही सकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडणाऱ्या, सकाळची कामं करणाऱ्या लोकांमुळे पुणे, मुंबईतील रस्ते दररोज गर्दीनं भरुन वाहतात. सकाळीच सुरु होणारी गर्दी रात्री हळूहळू ओसरत जाते. पण, जनता कर्फ्यू सुरू झाल्यानंतर मुंबई पुण्यातील रस्ते ओस पडले आहेत. याची साक्ष देणारा पुण्यातील हा रस्ता.
◼️केरळमध्ये जनता कर्फ्यूला प्रतिसाद
आज सुरू झालेल्या जनता कर्फ्यूला सर्वच राज्यातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. केरळमधील त्रिवेंद्रम शहरातील रस्ते असे ओस पडले आहे.
◼️सीएसएमटीही प्रवाशांविना ओस
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे रात्रंदिवस गर्दी असलेलं ठिकाण. मुंबई आणि उपनगरांसह देशभरातून लोक रेल्वेनं प्रवास करत येतात. त्यामुळे हे ठिकाण गर्दीनं नेहमी वाहत राहत.
Advt
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज