मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगांमधील गर्दी कमी करण्याचा निर्णय दिल्लीतील आपच्या सरकारने घेतला असल्याचे आज दिल्ली उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्यासाठी कैद्यांना विशेष पॅरोल आणि फर्लो रजा मंजूर करण्याचा विचार असल्याचे राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितले.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश हिमा कोहली आणि न्या. सुब्रह्मण्यम प्रसाद यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगांमधील गर्दी कमी करण्याची मागणी करणारी याचिका चार वकिलांनी दाखल केली आहे. यासंदर्भातील प्रक्रिया आजच्या आज सुरू करण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला या वेळी दिला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज