मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्र शासनाने कोरोना संसर्गजन्य रोगाला अटकाव करण्यासाठी मंगळवेढा शहरात जमावबंदीचाआदेश पोलिसांच्या पारित केला असताना दुकानदार मल्लिकार्जून इराप्पा पट्टणशेट्टी,दिनेश प्रभाकर पंडित,संदिप किसन सावंजी,आनंद सुधाकर खटावकर व सुहास लक्ष्मण जोशी या पाच जणांनी दुकानासमोर दहा ते पंधरा लोक एकत्रीत जमविल्याने शासनाच्या आदेशाचा भंग केल्याने त्यांच्याविरूध्द भा.दं.वि.सं. कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील आरोपी मल्लिकार्जून इराप्पा पट्टणशेट्टी यांचे राजहंस चौकात दुकान असून यांनी दि.२३ रोजी फिर्यादीत ४ वा. दुकानासमोर पाचपेक्षा अधिक लोक एकत्रीत जमवून शासनाच्या आदेशाचा भंग केला असल्याचे पोलिस कॉन्स्टेबल दर्लिंग बबन गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या घटनेत आरोपी दिनेश पंडित यांचे एम.एस.ई.बी.जवळ दि.२३ रोजी यांनी ४ वा. १० ते १५ एकत्रीत लोक जमवून शासनाच्या आदेशाचा भंग केला असल्याची फिर्याद पोलिस शिपाई दर्लिंग बबन गुरव यांनी दिली आहे.
तिसऱ्या घटनेत आरोपी संदिप सावंजी यांचे शिवप्रेमी चौकात सावंजी किराणा स्टोअर्स असून दि.२३ रोजी ४ वा. दुकानाच्यासमोर १० ते १५ दिलेली लाख एकत्रीत जमविल्याने शासनाच्या आदेशाचा भंग झाल्याचे पोलिस कॉन्सटेबल मळसिध्द कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
चौथ्या घटनेत किराणा दुकानदार आनंद खटावकर यांचे चोखामेळा येथील चौकात किराणा दुकान असून दि.२३ रोजी ४.३० वा . दुकान चालू ठेवून दहा ते पंधरा लोक एकत्रीत जमल्याने शासनाच्या आदेशाचा भंग केल्याची फिर्याद पोलिस कॉन्सटेबल इलाही मुलाणी यांनी दिली आहे.
पाचव्या घटनेत यातील आरोपी सुहास लक्ष्मण जोशी यांचे शनिवार पेठेत वेल्डिंग दकान असून ते . २३ रोजी ७ . ३९ वा . चालू ठेवून वेल्डिंग दुकानासमोर १० ते १५ लोक एकत्रीत जमवून शासनाच्या आदेशाचा भंग केल्याची फिर्याद पोलिस शिपाई इलाही मुलाणी यांनी दिली आहे.
Advt
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज