मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. करदात्यांना त्यातून मोठा दिलासा देण्यात आला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली आहे. या महासाथीच्या संकटामुळे जगभरावर आर्थिक संकट ओढवलं आहे. भारतातही अनेक उद्योगांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.
काही महत्त्वाच्या घोषणा पुढीलप्रमाणेः
५ कोटींची उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी जीएसटी रिटर्न भरण्यास उशीर झाल्यास सध्या दंड नाही.टी़डीएसवरील व्याज १८ टक्क्यांवरुन ९ टक्के करण्यात आले आहे.३० जून २०२० पर्यंत २४ तास कस्टम क्लियरन्सची सुविधा मिळत राहिल.
The last date for the income tax return for the financial year 18-19 is extended to 30th June 2020. For delayed payments interest rate has been reduced from 12% to 9%: Union Finance Minister Nirmala Sitharaman pic.twitter.com/Q3OHoh86SZ
— ANI (@ANI) March 24, 2020
मार्च, एप्रिल, मे महिन्यातील जीएसटी रिटर्न भरण्याची तारीखही ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली.विवाद ते विश्वास ही योजनाही आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. ३१ मार्च ते ३० जून या कालावधीत कोणतेही अतिरिक्त शूल्क द्यावे लागणार नाही.
आधार- पॅन कार्डशी लिंक करण्याची अखेरची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली. पूर्वी ती ३१ मार्चपर्यंत होती.आर्थिक वर्ष २०१८-१९ चा प्राप्तिकर परतावा भरण्याची अखेरची तारीख वाढवून ३० जूनपर्यंत करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज