मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यात वाढतो आहे. देश लॉकडाउन करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी सकाळी ११ वाजता संवाद साधणार आहेत.
लोकांच्या मनात असलेली भीती दूर व्हावी या दृष्टीने हा संवाद असणार आहे. राज्यातील वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा आणि सुव्यवस्था या पार्श्वभूमीवर शरद पवार हे जनतेशी संवाद साधतील. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२५ च्या वर गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेकांच्या भीतीचं वातावरण आहे. काळजी घेण्याचं, घराबाहेर न पडण्याचं आवाहन दररोज केलं जातं आहे.
महाराष्ट्रातील जनता त्याचं पालनही करते आहे. अशात त्यांच्या मनातली भीती मात्र कायम आहे. ही भीती घालवण्यासाठीच शरद पवार हे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज