टीम मंगळवेढा टाईम्स ।
पावासाळा सुरु होऊन साधारण तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं वाया जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

अशीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात देखील आहे. तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी मेला काय आणि जगला काय त्याचं सरकारला काहीच देणे घेणं नाही, अशी टीका शेतकऱ्यांनी सरकारवर केली आहे.

शेतकरी मेला काय आणि जगला काय त्याचे सरकारला काहीच देणे घेणे नाही
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा असी मागणी देखील केली आहे.

तिथं हुजरेगिरी करायची मात्र, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सरकारला वेळ नाही अशी टीका शेतकऱ्यांनी केली. शेतकरी मेला काय आणि जगला काय त्याचे सरकारला काहीच देणे घेणे नाही असे म्हणत शेतकऱ्यांनी सरकारवर थेट हल्लाबोल केला.

मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा
आमच्या शेतातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतावर कुठलाही मंत्री,आमदार खासदार आणखी आला नाही. किंवा शासनाचा कुठलाही प्रतिनिधी आला नाही. शेतात गांजाचे एक झाड सापडलं असतं तर सगळ प्रशासन धावत आलं असतं असी टीका देखील शेतकऱ्यांनी केली.

मात्र शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठी पंचनामा करण्यासाठी वेळ नाही. मग आम्ही शेतकऱ्यांनी जगाव का मरावं? आमच्या गुरांना चारा नाही पाणी नाही? हाताला काम नाही असे म्हणत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्र्यांना परदेशी दौरे करायला वेळ, मात्र शेतकऱ्याकडे बघायला वेळ नाही
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना परदेशी दौरे करायला वेळ आहेत मात्र शेतकऱ्याकडे बघायला वेळ नाही अशी टीका देखील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. सरकार आणि विरोधकांची एकजूट झाल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने वाळलेले 6 एककर शेतातील सोयाबीन मजूर लावण्यासाठी परवडत नसल्याने बाप लेकाने हाताने काढून टाकले. या सोयाबीनसाठी दोन ते अडीच लाख रुपये व्याजाने काढून खर्च केल्याचे शेतकऱ्याने हतबल होत सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














