मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
राज्य शासनाने शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, यापूर्वीच्या २०१९ मधील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजारांचेच कर्ज माफ होणार आहे.
त्यासाठी जास्तीची रक्कम आधी बँकेत भरावी लागणार आहे. त्यानंतरच योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाने तसा आदेश काढला आहे यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात २०१९ मध्ये शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती.

या योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे, त्यांना चालूवर्षीच्या कर्जमाफी योजनेत ५० हजारांचाच लाभ मिळेल, अशी अट ठेवण्यात आली आहे.

सरसकट कर्जमाफी होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. शेतकरी जून महिन्यात कर्जाची परतफेड करून नवीन कर्ज घेतात.

खरीप हंगामाच्या तोंडावर सरकारने कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास आधी जास्तीच्या थकीत कर्जाची रक्कम बँकेत भरावी लागणार आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, नव्याने कर्ज उचलता येणार आहे.

उर्वरित रक्कम भरण्यासाठी मार्च २०२७ पर्यंत मुदत आहे. परंतु, ही रक्कम उभी करायची की आता खरीप हंगामासाठी पैसे लावायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असणार आहे.

काय आहे एकवेळ समझोता (ओटीएस)
१ एप्रिल २०२९ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत कर्ज घेतले होते. परंतु, ते कर्ज नोव्हेंबर २०२५ रोजी थकीत असून, ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड झाली नाही.

अशा थकीत कर्जाचे मुद्दल व व्याजासह रक्कम २ लाखांपेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी प्रथम दोन लाखांपेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम बँकेत रकमेची परतफेड करणे आवश्यक आहे. ही रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एकवेळी समझोता (ओटीएस) २ लाखांचा लाभ देण्यात येणार आहे.
बँकांच्या भूमिकेकडे लक्ष
दोन लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज भरणे बंधनकारक आहे. उर्वरित मुद्दल व व्याजाची रक्कम भरून घेताना बँका शेतकऱ्यांना काही प्रमाणात सवलत देणार का की संपूर्ण रक्कम भरून घेण्यावर ठाम राहणार?, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे उर्वरित कर्जाबाबत बँका काय भूमिका घेतात?, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














