टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखानाचे चेअरमन शिवानंदजी पाटील यांचे राहटेवाडी येथे ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
लग्न सोहळ्याच्या निमित्ताने प्रवासादरम्यान थांबलेल्या चेअरमन पाटील यांच्याशी शेतकरी बांधवांनी मनापासून स्वागत करत आदरातिथ्य केले.

यावेळी चेअरमन पाटील यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर उसाच्या लागवडीपासून ते तोडणीपर्यंतच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.

आगामी हंगामात जास्तीत जास्त उसाची नोंदणी कारखान्याकडे करावी असे आवाहन करताना त्यांनी वीज पुरवठा, खतांची उपलब्धता, ऊस तोडणी मजूर, हार्वेस्टर यंत्रणा तसेच पाणीसाठा यांसारख्या प्रश्नांवर शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

कारखान्याच्या प्रगतीबाबत माहिती देताना, गाळपाचे टप्पे आणि आर्थिक स्थितीबाबत सभासदांना अवगत करण्यात आले. चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत अदा केल्याबद्दल संचालक मंडळाचे कौतुक करण्यात आले.

शेतकरी हा कारखान्याचा कणा आहे. त्यांच्या अडचणी समजून घेतल्यास कारखान्याचा कारभार अधिक सक्षम आणि पारदर्शक होतो.

आगामी हंगामात शेतकऱ्यांना योग्य दर आणि वेळेत पेमेंट देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन चेअरमन पाटील यांनी केले.
या वेळी ग्रामस्थ, सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













