मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील ग्रामिण भागातील वाड्यावस्त्यावरील शेतरस्ते /पाणंद रस्ते नव्याने होण्यासाठी मशीनचे सहाय्याने जलद गतीने कामे होण्यासाठी “मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना” या योजनेतून ज्या शेतकऱ्यांना, गरजू नागरिकांना शेत रस्ते

तसेच पानंद रस्त्यांची गरज आहे त्यांनी तत्काळ तहसीलदार यांच्याकडे त्या भागातील शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन रस्त्याची मागणी करावी व त्याची एक प्रत आमदार संपर्क कार्यालयात देण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवले आहेत.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी इत्यादी कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यकता असते.
तसेच शेतीतील कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे.हल्ली गावातील लोक शेतात जाऊन राहिल्यामुळे लोकांना ये जा करण्यासाठी रस्ते गरजेचे आहेत.

तसेच अनेकवेळा पावसामुळे अनेक वाड्यावस्त्यावरील नागरिकांना चिखल, दगडगोटे, खड्डे यामुळे येणे जाणे जिकिरीचे होते. तालुक्यात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने शेतातून दूध गावात आणण्यासाठीदेखील रस्ते चांगले नसल्याने नागरिकांना गैरसोईचे होते.
परंतु अनेक शेतरस्ते हे सामान्यतः रस्ते योजनेत समाविष्ट नसल्यामुळे नागरिकांना अडचणीचे ठरत आहे.तसेच अनेक ठिकाणी शेतीच्या रस्त्यावरून भांडणे, अतिक्रमण हे विषय येत असल्याने वाद होतात त्यामुळे शेतकऱ्यांची रस्त्याची समस्या कायम राहते त्यामुळे शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे रस्त्यांची उपलब्धता व्हावी यासाठी

राज्य मंत्रिमंडळाने पूर्वीच्या मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ते योजने सुधारणा करीत मुख्यमंत्री – बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजनेस मान्यता दिली असून या योजनेतून मंगळवेढा पंढरपूर तालुक्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या पानांद रस्त्यांचा लाभ होऊन त्यांची रस्त्याची समस्या कायमची दूर व्हावी यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी येथील यंत्रणा कामास लावली आहे.
मुख्यमंत्री – बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आ समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी सचिव असलेल्या यासह अधिकारी व पाच शेतकरी अशा 11 जणांची विधानसभा क्षेत्रीय समिती गठित केली आहे या समितीच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामाला गती दिली जाणार प्रशासकीय मान्यता विधानसभा क्षेत्र समितीचे सदस्य सचिव उपविभागीय अधिकारी हे देणार असल्याने मागणीप्रमाणे तत्काळ मंजुरी मिळणार आहे.

गाव नकाशांवर दर्शविण्यात आलेले व शासकीय जागेत असलेल्या रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्याने जर अतिक्रमण काढले नाही तर सदर अतिक्रमण शासन स्तरावरून तहसीलदार यांच्यामार्फत काढण्यात येईल.
त्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या ठिकाणी नवीन रस्ते होण्यासाठी त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन रस्ता मागणीचे निवेदन तयार करून संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात यावे
तसेच त्याची एक प्रत आमदार संपर्क कार्यालयात देण्यात यावी जेणेकरून त्याचा प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून कामे लवकर मार्गी लागतील त्यामुळे गरजू शेतकऱ्यांनी आपले पाणंदरस्ते मागणीचे अर्ज तहसीलदार यांना तात्काळ देण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













