टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी २४ गावांची भव्य पाणी परिषद निंबोणी येथे आज मंगळवार दिनांक ५ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती २४ गाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.
तर दुसरीकडे मंगळवेढा तालुक्यात दुष्काळावर मात करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक आज बैठक बोलावली आहे.
२४ गावांच्या पाणी संघर्ष समितीच्या वतीने यापूर्वी पाटकळ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये शासनाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितापूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी द्यावी अन्यथा २४ गावांनी पुढील सर्व निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार टाकणे व कर्नाटकला गावे जोडा असा इशारा दिलेला होता. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
सदर २४ गावातील लोकांना शासन आपल्या २४ गावांची दखल घेऊन पाणी प्रश्न मार्गी लागेल, अर्थसंकल्पात तरतूद होऊन योजनेला मंजुरी मिळेल असे वाटले होते.
परंतु अद्यापही राज्य मंत्रीमंडळांने मंजुरी न दिल्यामुळे २४ गावातील सर्व शेतकरी महिला पदाधिकारी यांची भव्य पाणी परिषद निंबोणी येथे आज मंगळवार दिनांक ५ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मारुतीचे पटांगण, निंबोणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजन करण्यात आले आहे.
सध्या सकाळी 24 गाव मध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती असून जनावरांना चारा पाणी विकतचा घेतला जात आहे. फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना टॅंकरने पाणी घालून भागात जगवायला लागत आहे.
अनेकांना फळबागांना पाणी न मिळाल्यामुळे पाण्याअभावी बागा जळून जात आहेत. त्यामुळे पाणी प्रश्नावरून येथील नागरिकांच्या तीव्र भावना आहेत. शासनाने यांच्या भावनांचा विचार लोकसभा आचारसंहितेपूर्वी करणे गरजेचे असल्याचे अनेक ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. नेता इस 24 कावे टोकाचा निर्णय घेऊ शकतात असेही बोलले जात आहे.
24 गावातील विविध गावातून मोटरसायकलच्या रॅली द्वारे शेतकरी निंबोणी गावांमध्ये पाणी परिषदेला पोचणार आहेत असल्याची माहिती कळत आहे. तरी २४ गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून पाणी परिषद यशस्वी करावी असे पाणी संघर्ष समितीच्या वतीने अहवान करण्यात आले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील टंचाई संदर्भात आज आमदार आवताडे यांची आढावा बैठक
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये गतवर्षी अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडल्याने निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आज मंगळवार सकाळी १०.०० वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे टंचाईची परिस्थिती जाणून घेण्यासाठी
आढावा बैठक बोलावली असून मंगळवेढा तालुक्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी सर्कल, कृषी सहाय्यक, पाणीपुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग तसेच वीज वितरण यांच्यासह सर्व गावचे सरपंच, उपसरपंच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार अवताडे यांच्या संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
गतवर्षी अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जमिनीमध्ये पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. कमी पावसामुळे सर्व विहिरी कोरड्या पडल्या आहेत तसेच बोअर बंद असल्याने नागरिकांचे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे अतोनात हाल होत आहे.
तसेच जनावरांना चारा टंचाई जाणवत आहे. या सर्व बाबींचा विचार करून आमदार आवताडे यांनी सदर आढावा बैठकीचे नियोजन करून वरील दुष्काळजन्य समस्यांवरती उपाय योजना विचार विनिमय व आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे.
तरी मतदार संघातील सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांनी तसेच संबंधित विभागातील पदाधिकारी व अधिकारी यांनी या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज