टीम मंगळवेढा टाईम्स । सतत एक ना एक संकटाशी सामना करत असणाऱ्या बळीराजाला यंदा निसर्गाने चांगली साथ दिली असून राज्यात सोलापूर जिल्ह्यात सरासरी चांगला पाऊस झाला असून शेतकरी सध्या आपल्या पिकांसाठी रासायनिक खत मागणी करत असून पण गेल्या दहा दिवसापासून मंगळवेढा तालुक्यात पिकांच्या वाढीसाठी मुख्य रासायनिक खत असलेलला युरिया सध्या तालुक्यातुन हद्दपार झाला की काय असा सवाल उपस्थीत होत आहे.
कारण आज वारंवार शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी आज थेट तालुका कृषिअधिकारी कार्यालय गाठलं व तालुक्यातील होणाऱ्या युरिया खताच्या तुटवड्या संबधीत प्रश्न विचारले असता त्यानी उडवा उडवीची उत्तर दिली.
तसेच कृषी विभागामार्फत शासन राबवत असलेल्या सर्व योजनांची माहिती देण्यासही त्यानी टाळा टाळ केल्याने आक्रमक झालेल्या प्रहार कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन दिले असुन जर येत्या 15 ऑगष्ट पर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्द न झाल्यास तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या तोंडाला शेणखत फासू असा इशारा दिला आहे.
If the farmers do not get urea, the agriculture department will ignore it
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज