टीम मंगळवेढा टाईम्स । प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलाला झाडाला बांधून झालेली मारहाण ही अत्यंत घृणास्पद व निंदनीय घटना आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरणातील प्रेमीयुगलाचा आंतरजातीय विवाह झाला होता आणि हे प्रकरण पोलिसांसमोर मिटले होते. पण मुलीच्या नातेवाईकांना योग्यप्रकारे समज न दिल्यामुळे हा निंदनीय प्रकार घडला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यापासून या प्रकरणासह अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. अनेक युवकांच्या हत्याही झाल्या आहेत. यावरून एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आली आणि त्यांचा गृहमंत्री झाला की अख्या राज्याचेच नियंत्रण सुटते असा हल्लाबोल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला. ते भाळवणी (ता.मंगळवेढा) येथील पीडित कुटुंबाच्या भेटीदरम्यान बोलत होते.
आमदार पडळकर पुढे म्हणाले, अशा प्रकारची अमानुष गोष्टी घडल्यानंतर जातीय तेढ निर्माण होते. त्यामुळे कोणीही जातीय तेढ निर्माण होईल असे प्रकार करू नयेत. लोकांच्या मानसिकतेत आजही बदल होताना दिसत नाहीत.
भाळवणी येथील पीडित बरकडे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान आमदार पडळकर यांनी त्यांची विचारपूस करीत धीर दिला. तसेच पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्याशी सदर प्रकरणात कोणकोणते गुन्हे दाखल झाले आहेत याविषयी चर्चा करीत आरोपींना कडक शासन करण्याकरिता योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना केल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, उपनिरीक्षक सचिन खटके, माऊली हळणकर, तानाजी खरात, प्रा.सुभाष मस्के, रासपचे युवक जिल्हाध्यक्ष बापूसाहेब मेटकरी, तालुकाध्यक्ष धनाजी गडदे,अमोल माने, बिरुदेव घोगरे, वसंत गरंडे, मल्हार महासंघाचे तालुकाध्यक्ष अंकुश गरंडे, तानाजी रोकडे, अॅड. रविकिरण कोळेकर, तानाजी चौगुले, दामाजी सरगर, विठ्ठल सरगर, शिवाजी मेटकरी, जगु गोरड, सचिन करे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
When the NCP becomes the Home Minister, the state loses control; MLA Gopichand Padalkar
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज