टीम मंगळवेढा टाईम्स ।
विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीत विजयाच्या मार्गावर असलेल्या अभिजित पाटील यांनी समर्थकांसह गुलाल उधळला.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मतमोजणीत त्यांनी निर्णायक आघाडी घेतली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत अभिजित पाटील गट १ हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होता.
विठ्ठल कारखान्याच्या २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी तहसील कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये सुरुवात झाली.
२० टेबल सहा राउंडमध्ये ही मतमोजणी झाली. प्रथम भाळवणी गटात मतमोजणीत अभिजित पाटील पॅनल ५०० च्या फरकाने काळे – भालके व युवराज पाटील पॅनलपेक्षा आघाडीवर होते.
त्यानंतर करकंब गटातही अभिजित पाटलांचा करिश्मा कायम होता. महत्त्वाच्या मोठ्या गावांमध्ये त्यांनाच मताधिक्य होते.
त्यामुळे दुसऱ्या राउंडअखेर जवळपास १५०० पेक्षा जास्त मतांनी त्यांची आघाडी कायम होती. त्यानंतर तुंगत व मेंढापूर गटात युवराज पाटील पॅनलने जोरदार मुसंडी मारत तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
तरीही अभिजित पाटील पॅनल त्यांच्या पुढेच होता. मात्र, त्यांचे मताधिक्य कमी करण्यात युवराज पाटील पॅनलने यश मिळविले होते.(स्रोत:लोकमत)
संस्था मतदारसंघातून समाधान काळे विजयी..
संस्था मतदारसंघात झालेल्या मतमोजणीत भालके – काळे पॅनलचे उमेदवार समाधान काळे हे ८८ पैकी ६४ मते घेऊन विजयी झाले आहेत तर राजाराम सावंत यांना ५ , तर बाळासाहेब पाटील यांना १९ मते मिळाल.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार सध्याच्या स्थितीत नवखे अभिजित पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा हादरा मनाला जात आहे. अभिजीत पाटील यांची विजय कडे वाटचाल सुरू आहे.
पंढरपूरचे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून या कारखान्याच्या सत्तेकडे पहिले जाते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या मतदानाचा फटका राष्ट्रवादीला बसल्याचे चित्र असून विद्यमान अध्यक्ष भगिरथ भालके यांचे पॅनल पिछाडीवर गेले आहे.
अद्याप संपूर्ण निकाल हाती येणं बाकी असलं तरी अभिजीत पाटील यांच्या पॅनलनं मोठी बाजी मारली असल्याचं आतापर्यंतच्या कलामधून स्पष्ट झालं आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादीकडूनच युवराज पाटील यांनीही आपले पॅनल उभे केले होते. मात्र आत्तापर्यंतच्या मतमोजणीत विद्यमान अध्यक्ष भगिरथ भालके यांचे पॅनल तिसऱ्या स्थानावर असून अभिजित पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.
अतिशय तरुण नेता म्हणून अभिजित पाटील यांना पसंती देताना त्यांच्या ताब्यात असणाऱ्या इतर चार साखर कारखान्यामुळे विठ्ठलाच्या मतदारांनी अभिजित पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
पाटील यांनी 20 वर्षांपासून बंद पडलेला सांगोला सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेऊन केवळ 35 दिवसात तो सुरु केला होता. यामुळेच गेल्या 2 वर्षांपासून बंद पडलेल्या विठ्ठल कारखान्यासाठी सभासदांनी अभिजित पाटील यांना पसंती दिल्याचे दिसत आहे.
या पराभवाचा फटका राष्ट्रवादी आणि भगिरथ भालके याना बसणार असला तरी मतमोजणी प्रक्रियेवर दुसरे पॅनल प्रमुख युवराज पाटील यांनी आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली आहे.
साडे सहाशे कोटी देणी असणाऱ्या असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सत्ता मिळविण्यासाठी चढाओढ
पंढरपूरचे वैभव म्हणून ओळख असणाऱ्या आणि सध्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी राजकीय नेत्यात चढाओढ सुरु आहे.
विठ्ठल कारखान्यावर सध्या भगिरथ भालके गटाची सत्ता आहे. मात्र एका गाळपाचे बिल देऊ न शकल्याने तसेच कामगार आणि ऊस तोडणी मजुरांची देणी थकीत असल्याने सत्ताधारी भालके गट बॅकफूटवर आहे.
अशात आर्थिक अडचणींमुळे आणि कोट्यवधींचे कर्जे झाल्याने हा कारखाना गेली 2 वर्षे सुरु झालेला नाही. यामुळे सध्या लागलेल्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत हा कारखाना जिंकण्यासाठी धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कंबर कसली होती. त्यांच्याकडे उस्मानाबाद, नाशिक, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात 4 कारखाने आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज